एक्स्प्लोर

Nashik Crime : भय इथले संपत नाही, नाशिक शहरात रक्तपात वाढताेय!

Nashik Crime : आध्यात्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) शहरात अवघ्या 24 तासांत तीन खून (Murder) झाले आहेत. यामुळे नाशिकमध्ये आता रक्तपात वाढताेय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nashik Crime : नाशिकसह राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर सारख्या स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांत गुन्हेगारी वाढत आहे. नाशिक शहरांत मागील 24 तासांत तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सदर घटनांमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का आणि नागरिकांना सुरक्षित वाटेल का? असा प्रश्न उपस्थित झाला असून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात पोलिसांना पूर्ण अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक ही मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पर्यटक, भाविक आदींसह रोजगारासाठी इतर राज्यातील नागरिक नाशिक शहारत दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अलीकडच्या काळात वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे क्षेत्र होतंय कि काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. नाशिकमध्ये अवघ्या 24 तासांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यासह वाहनांची तोडफोड-जाळपोळ, घरफोडी, मारहाण अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असताना, अशा पद्धतीने होणाऱ्या घटनांमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान गुरुवारी नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एका यश गांगुर्डे युवकाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सुरु होतो न होतो तोच पूर्णिमा बस स्टॉपवर मध्यरात्री पुण्यातील एका इसमाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. तर लागलीच हि घटना झाल्यानंतर आनंदवल्ली शिवारातील बेंडकुळे नगर येथे विपुल खैरे या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तपासाअंती त्याचा खून आल्याचे निष्पन्न झाले. याचा खून करण्यात आला आहे. म्हणजे जवळपास 24 तासांत तीन खून शहरात घडले आहेत. यावरून दिसून येते कि शहरातील रक्तपात किती वाढतो आहे. यामुळे नाशिक शहरात पोलिसांचे वर्चस्व आहे कि गुन्हेगारांचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर कोण घालणार, पोलीस काय करताय? सामान्य नागरिकांची सुरक्षितता? असे कितीतरी प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. 

एकूणच नाशिकमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुंड, तडीपार गुंडांकडून दिवसाढवळ्या घडणारे गुन्हे, घरफोडीच्या घटना, किरकोळ मारहाण, लूटमार यामुळे कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या मोठ्या शहरातील गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांकडून सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत, तरच नागरिकांचे जगणे सुसह्य होऊ शकेल.

जीवे मारण्याची प्रवृत्ती
दरम्यान अशा गुन्हेगारीच्या घटनांवरून लक्षात येते कि, क्षुल्लक कारणावरून जीवे मारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी नाशिक सह इतरही महत्वाच्या शहरात गुन्हेगारी वाढते आहे. यातील काही घटनांमध्ये पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Nashik Rain: नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस
नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठा विसर्ग, अनेक गावांत पुराचं पाणी शिरलं, शेतीचं मोठं नुकसान; नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget