एक्स्प्लोर

Nashik Jayant Patil :  गद्दार, खोके म्हटलं की झोंबतं, म्हणजे काही ना काही झालं असेल, जयंत पाटलांचे सूचक विधान 

Nashik Jayant Patil : ते वाक्य कुणी उच्चारू नये, अशी व्यवस्था करण्याचे काम न्यायालयीन मार्गाने सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

Nashik Jayant Patil : गद्दार, खोके ही वाक्ये काही लोक स्वतःला लावून घेत आहेत, त्यामुळे आम्ही काय करणार, पण जर ही वाक्ये त्यांना झोंबत असतील आणि त्याअनुषंगाने जर कोर्टात जावं लागत असेल, तर याचा अर्थ काही ना काही झालं असेल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. त्याचबरोबर ते वाक्य कुणीच उच्चारू नये, अशी व्यवस्था करण्याचे काम न्यायालयीन मार्गाने सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून पक्ष बांधणीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर बूथ रचना, कार्यकर्त्यांची बैठक आदी बाबीसाठी ते नाशिकमध्ये आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडी सभा आयोजित करण्यात आली असून अलीकडच्या सभांना जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. ही सभा मोठी होणार असून महाराष्ट्रातील सर्व विभागात आम्ही सभा घेणार आहोत. तर या सभेला शरद पवार उपस्थित राहणार की नाही, हे आम्ही आज उद्या ठरवू, असेही ते म्हणाले. 

तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या पंढरपूर सभेच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले कि, हा फार महत्वाचा विषय वाटत नाही. गर्दी कुणी, कुठे जमवली याला फार महत्त्व राहिलं नाही. तर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील म्हणाले होते कि, राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले कि, सुप्रीम कोर्टाच्या निकालात जर अपात्र झालं, तर या सरकारला राहता येणार नाही. आणि दुसरा पर्याय राहत नाही, त्या अनुषंगाने बोललो असल्याचे ते म्हणाले. गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले कि, ही अशी सगळी लोकं भारतीय जनता पक्षाने गोळा केली आहे. यातून भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. भाजपने राजकारणाचा स्तर कुठे नेऊन ठेवलाय, हे यातून दिसतं.

गद्दार, खोके ही वाक्य झोंबतात... 

दरम्यान दिल्ली हायकोर्टाने उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना हजर राहण्याचे आदेश दिले. यावर पाटील म्हणाले कि, गद्दार, खोकेही वाक्य काही लोकं स्वतःला लावून घेत आहे, त्याला आम्ही काय करणार? पण जर त्यांना हे झोंबत असेल, कोर्टात जावं लागत असेल, याचा अर्थ काही ना काही झालं असेल. ते वाक्य कुणीच उच्चारू नये, अशी व्यवस्था करण्याचे काम न्यायालयीन मार्गाने सुरू आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्या यासाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता आहे. तसेच सध्या राज्यात सावरकर वादावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कलह सुरु आहे. यावर जयंत पाटील म्हणाले कि, ते दोघे ठरवतील काय करायचे ते. त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर म्हणाले ... 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना भेटीसाठी वेळ देण्याचे आदेश दिले आहेत. सावळा गोंधळ या मंत्रीमंडळाचा आहे. हे मंत्री विधानसभेच्या सभागृहात देखील नसतात. ते लोकांना काय भेटणार? आता जनतेला भेटण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ सरकारवर आली असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर ते म्हणाले की, जनता हीच राम समजून जनतेची सेवा केली पाहिजे. सर्व मंत्रीमंडळ जाणं, हे प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला न रूचणारे आहे. आम्हीही राम भक्त आहोत. स्वतः एकटं जाऊन, काय पूजा करायची, ती करा..पण आता सत्ता आहे.सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही, हे कायम लक्षात ठेवायचं असतं, असा टोमणाही पाटील मुख्यमंत्र्यांना दिला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त ठाकरेंनी महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारले, म्हणाले....Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार
Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता
Embed widget