एक्स्प्लोर

Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत

ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना (Rabi Crop) बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

Nandurbar Agriculture News : राज्याच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. सध्या नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळं गारठा कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना (Rabi Crop) बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळं रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

वातावरणातील बदलांचा शेती पिकांना फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तर दुसरीकडं अजून चार ते पाच दिवस हा वातावरणातील बदल राहण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं व्यक्त केला आहे. अतिवृष्टीमुळं यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. उरली सुरली पीकं परतीच्या पावसामुळं वाया गेली. अशा स्थितीत राज्यातील शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. वातावरणातील बदलांचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हरभरा ज्वारीसह फळ पिकांनाही फटका बसण्याची शक्यता

रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारीच्या पिकांवर बदलत्या हावामानाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच इतर फळ पिकांवर देखील ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळ फळ उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत.

अतिवृष्टीचा  शेती पिकांना मोठा फटका

यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं. याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची हातात आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. कापूस, सोयाबीन यासह फळ पिकांचे नुसकाल झाले आहे. काही ठिकाणी पीक वाया गेली आहेत, तर काही ठिकाणी जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Soyabean Price : आठवडाभरात सोयाबीनच्या दरात 900 रुपयांची घसरण, नंदूरबार बाजार समितीत आवक कमी, शेतकऱ्यांना दर वाढीची अपेक्षा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget