एक्स्प्लोर

देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा धक्कादायक खुलासा

देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.तर रस्ते अपघाताला आपलेच इंजिनियर्स जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर : देशातील 30 टक्के वाहन परवाने हे बोगस आहेत. हा धक्कादायक खुलासा आज नागपुरात खुद्द केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी ह्यांनी केलाय. मात्र, त्याचबरोबर आपले अधिकारी आणि इंजिनियर्स ह्यांना ह्या बोगस लायसन्स, रस्त्यावरचे मृत्यू ह्याला जवाबदार धरले आहे. गडकरी हे रस्ता सुरक्षा अभियानाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ह्या कार्यक्रमाला अभिनेता मकरंद अनासपुरेही उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वाहन परवाना घ्यायला सर्वात सोपा देश भारत आहे. आरटीओ ऑफिसर्सची माफी मागतो. पण, गांधीजी दिसले की मारा ठप्पा. सांगायला लाज वाटते पण 30% लायसन्स बोगस असल्याचा दावा गडकरी यांनी केलाय. आपला मुलगा किंवा मुलगी मरेपर्यंत लोक सुधारत नाही. मी स्वतः कधीही सरकारी गाडी वापरत नाही. कुठल्याही पदावर जाऊ देत कारण सुरक्षा महत्वाची आहे. यासाठी मी नियम बदलले आहे.

रस्ते अपघातासाठी इंजिनियर्स जबाबदार गरीब माणसालाही सुरक्षा हवी का म्हणून एअर बॅग्स फक्त मोठ्या गाड्यांना? सर्व गाड्यांना एअर बग्स हव्या, असे मत गडकरी यांनी व्यक्त केलं. ह्यावेळी पैसे मिळाले की आरटीओ अधिकारी लायसन्स देतात अशी टीकाही त्यांनी आपल्याच व्यवस्थेवर केली आहे. तर रस्त्यावरच्या अपघाताला गडकरींनी आपल्याच इंजिनियर्सला जबाबदार धरले आहे. रोड इंजिनियरिंग महत्वाचे आहे. अर्ध्या रस्त्यावरच्या मृत्यूंना तर ह्यांचे इंजिनियर जबाबदार आहे. ह्यांचा डी पी आर, ह्यांचे लोक इतके फ्रॉड आणि बोगस आहेत. मी आता 12000 कोटी रुपये खर्च करून ब्लॅक स्पॉट्स ठीक केले आहे. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर जयसिंगपूर येथे 150 लोकांना रस्ता वाकडा असल्यामुळे जीव गमवावा लागला. पण, कोणी काही केले नाही. तो मी ठीक केला आता कोणी तिथे पडत नाही, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
Embed widget