एक्स्प्लोर

RTMNU : कुलगुरू, माफी मागा अथवा राजीनामा द्या ; अधिकारबाह्य निर्णयाची कबुली, विद्यापीठ प्रशासनाने काढले पत्र

विद्यापीठाच्या पत्रानंतर वाजपेयी यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'कुलगुरुंनी नैतिक जवाबदारी स्वीकारून, अंर्तआत्म्यास विचारून सद्सद्विवेक बुद्धीने कुलगुरू पदाचा त्वरित राजीनामा द्यावा.'

RTMNU News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) यजमानपदाखाली आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसचा शनिवारी समारोप झाला. दुसऱ्याच दिवशी कुलगुरूंना फटाके लावण्याचा क्रमही सुरू झाला आहे. अॅड. मनमोहन बाजपेयी यांचे सिनेट सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय विद्यापीठाने परत घेतला आहे. अॅड. बाजपेयी यांना पाठविलेल्या पत्रात विद्यापीठाने अधिकारबाह्य निर्णयाची कबुलीही दिली आहे. 

विद्यापीठाच्या पत्रानंतर अॅड. बाजपेयी यांनी आक्रमक भूमिका घेत कुलगुरूंना पत्र पाठविले आहे. त्यात वर्तमानपत्रांतून जाहीर माफी मागा अथवा राजीनामा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठात नेमके काय सुरू आहे, कशाप्रकारचे निर्णय घेतले जातात, याबद्दल आता वेगवेगळया चर्चेला पेव फुटले आहे. हाच नव्हे तर यापुवींही कुलगुरूंनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यावरून आंदोलनही झाले होते. त्यामुळे कुलगुरूंच्या निर्णयांबद्दल आता शंका वाढू लागल्या आहेत. 

'कुलगुरू, आपण घेतलेल्या अनेक बेकायदेशीर निर्णयामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. शैक्षणिक वर्तुळात चुकीचा संदेश गेला आहे. वेळोवेळी कायदयाचे उल्लंघन केले आणि म्हणून आपणास कुलगुरू या संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही, तरी नैतिक जवाबदारी स्वीकारून, अंर्तआत्म्यास विचारून सद्सद्विवेक बुद्धीने कुलगुरू पदाचा त्वरित राजीनामा द्यावा,' असे अॅड. बाजपेयी यांनी पत्रात नमुद केले आहे. 

ऑगस्टमध्ये ठरविले होते अपात्र

अॅड. मनमोहन बाजपेयी यांना 12 ऑगस्ट रोजी आदेश काढून सीनेटसाठी अयोग्य ठरविण्यात आले होते. त्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर विद्यापीठाने आज पुन्हा पत्र पाठविले आहे. त्यात सीनेट सदस्याला अयोग्य ठरवण्याचे अधिकार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार कुलपतीकडे असल्याचे विद्यापीठाने मान्य करीत यापूर्वी अॅड. बाजपेयी यांना अयोग्य ठरविण्याचा आदेश परत घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी कायदेशीर उत्तर व स्पष्टीकरण नसल्याने कुलगुरूंनी आपलाच आदेश परत घेतल्याचे अॅड. बाजपेयींचे म्हणणे आहे. 

माझी बदनामी, आपणच जबाबदार

बेकायदेशीर आदेशामुळे माझी जनमानसात बदनामी झाली. मानसिक त्रास सहन करावा लागला, माझ्या सिनेट कारकिर्दीचे 19 दिवस हिरावून घेण्यासह संपूर्ण कारकिर्दीवर अधिकार नसतांना प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्यासाठी कुलगुरूच जवाबदार आहेत. या हानीची भरपाई कशी कराल याचे ही स्पष्टीकरण कुलगुरूंनी जाहीरपणे द्यावे. सीनेट सदस्याला अयोग्य ठरवण्याचे अधिकार केवळ कुलपतींना आहे, हे समजण्यासाठी 4 महिन्यापेक्षा जास्तीचा अवधी लागला, यावरून आपण विद्यापीठ कायद्याची वेळेत व निष्पक्ष अंमलबजावणी करू शकत नाही हे सिद्ध होत असल्याचे अॅड. बाजपेयींनी पाठविलेल्या पत्रात नमूद आहे.

अनेकदा कायद्याचे उल्लंघन

'आपण अनेकदा कायद्याच्या विविध कलमांचे चुकीचे अर्थ लावलेले, किंबहुना कायद्यांचे उल्लंघन केलेले आहे. आपल्याला अधिकार नसतांना बेकायदेशीर निर्णय घेतलेले आहेत. कुलपतींच्या आणि  महाराष्ट्र सरकारच्या अधिकारावर घाला घालत आपल्याला अधिकार नसतांना ते बेकायदेशीर वापरले आहेत. अधिकाराच्या बाहेर जाऊन संशोधन केले आहे. या बेकायदेशीर निर्णयामुळे आपण अनेक जणांना उच्च न्यायालयात जाण्यास भाग पाडले आहे व त्या सर्वांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान केले आहे, याला आपणच जवाबदार आहात.', असेही पत्रात नमूद आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'भारत जोडो' नंतर काँग्रेसची 'हात से हात जोडो यात्रा' ; आज नागपुरात महत्वाची बैठक

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget