एक्स्प्लोर

Jallianwala bagh massacre : जालियनवाला हत्याकांडामुळे भारतात खूप काही बदलले होते, जाणून घ्या सविस्तर

Jallianwala Bagh Massacre : 103 वर्षांपूर्वी एक वेदनादायक हत्याकांड घडले, ज्याने पंजाबसह संपूर्णभारत देशावर असा प्रभाव पाडला

Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांडाच्या या एका घटनेने देशाच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली आणि या घटनेने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला असे अनेक इतिहासकार म्हणतात. 103 वर्षांपूर्वी असेच एक वेदनादायक हत्याकांड घडले, ज्याने पंजाबसह संपूर्ण देशावर असा प्रभाव पाडला, ज्याचा डंका भारत आजही विसरलेला नाही. या घटनेत शांतताप्रिय आंदोलक जमावावर सातत्याने गोळीबार करण्यात आला. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

त्या दिवशी काय झाले?
अमृतसरमध्ये कर्फ्यू असूनही, 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बाग येथे ब्रिटीश दडपशाही कायद्याच्या निषेधार्थ तसेच दोन नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ हजारो लोकं शांततेने एकत्र जमले. पण इथे ब्रिटीश आर्मीची जनरल डायरची तुकडी या बागेत आली आणि त्यांनी लोकांवर कोणताही इशारा न देता गोळीबार केला आणि गोळ्या संपेपर्यंत हा गोळीबार सुरूच होता.

किती लोक मारले गेले?
या हत्याकांडात किती लोक मारले गेले यावर वाद सुरू आहे. या दरम्यान 10 ते 15 मिनिटे गोळीबार चालला, ज्यामध्ये 1650 राउंड फायर करण्यात आले. इंग्रजी सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ 219 लोकांचा मृत्यू झाला. तर मदन मोहन मालवीय यांच्या समितीने हा आकडा 500 च्या वर असल्याचे सांगितले. परंतु चेंगराचेंगरी आणि विहिरीत उडी मारून झालेली मृत्यू यासह हा आकडा एक हजाराहून अधिक असल्याचे अनेकांचे मत आहे.

काय तात्काळ परिणाम झाला?
या घटनेने संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध रोष निर्माण झाला होता. बर्‍याच मध्यमवर्गाचा इंग्रजांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारकडून नाइटहूडचा सन्मान परत केला. या घटनेचा तरुणांमध्ये एवढा रोष होता की, देशसेवेची बीजे भगतसिंगांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांमध्ये रोवली गेली. गांधींच्या असहकार चळवळीला मोठ्या प्रमाणावर यश मिळू लागले.

स्वातंत्र्याचा पाया रचला
या हत्याकांडाने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया घातला यात शंका नाही. गांधीजींच्या असहकार आंदोलनाला भारतीय जनतेच्या प्रत्येक वर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याने स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. जिथे नवीन लोक चळवळीत सामील झाले. नेत्यांचा आत्मविश्वास खूप वाढला 

सर्वत्र तरुणाईचा रोष
1920 च्या दशकात उत्तर भारतात झालेल्या सर्व क्रांतिकारी चळवळी आणि घटनांमागे जालियनवाला बागची घटना कारणीभूत आहे, ज्यामुळे रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आपल्या क्रांतिकारी पक्षात अनेक लोकांना भरती करू शकले. त्याच वेळी काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांनी पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीवर भर दिला.

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget