एक्स्प्लोर

Jallianwala bagh massacre : जालियनवाला हत्याकांडामुळे भारतात खूप काही बदलले होते, जाणून घ्या सविस्तर

Jallianwala Bagh Massacre : 103 वर्षांपूर्वी एक वेदनादायक हत्याकांड घडले, ज्याने पंजाबसह संपूर्णभारत देशावर असा प्रभाव पाडला

Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांडाच्या या एका घटनेने देशाच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली आणि या घटनेने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला असे अनेक इतिहासकार म्हणतात. 103 वर्षांपूर्वी असेच एक वेदनादायक हत्याकांड घडले, ज्याने पंजाबसह संपूर्ण देशावर असा प्रभाव पाडला, ज्याचा डंका भारत आजही विसरलेला नाही. या घटनेत शांतताप्रिय आंदोलक जमावावर सातत्याने गोळीबार करण्यात आला. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

त्या दिवशी काय झाले?
अमृतसरमध्ये कर्फ्यू असूनही, 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बाग येथे ब्रिटीश दडपशाही कायद्याच्या निषेधार्थ तसेच दोन नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ हजारो लोकं शांततेने एकत्र जमले. पण इथे ब्रिटीश आर्मीची जनरल डायरची तुकडी या बागेत आली आणि त्यांनी लोकांवर कोणताही इशारा न देता गोळीबार केला आणि गोळ्या संपेपर्यंत हा गोळीबार सुरूच होता.

किती लोक मारले गेले?
या हत्याकांडात किती लोक मारले गेले यावर वाद सुरू आहे. या दरम्यान 10 ते 15 मिनिटे गोळीबार चालला, ज्यामध्ये 1650 राउंड फायर करण्यात आले. इंग्रजी सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ 219 लोकांचा मृत्यू झाला. तर मदन मोहन मालवीय यांच्या समितीने हा आकडा 500 च्या वर असल्याचे सांगितले. परंतु चेंगराचेंगरी आणि विहिरीत उडी मारून झालेली मृत्यू यासह हा आकडा एक हजाराहून अधिक असल्याचे अनेकांचे मत आहे.

काय तात्काळ परिणाम झाला?
या घटनेने संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध रोष निर्माण झाला होता. बर्‍याच मध्यमवर्गाचा इंग्रजांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारकडून नाइटहूडचा सन्मान परत केला. या घटनेचा तरुणांमध्ये एवढा रोष होता की, देशसेवेची बीजे भगतसिंगांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांमध्ये रोवली गेली. गांधींच्या असहकार चळवळीला मोठ्या प्रमाणावर यश मिळू लागले.

स्वातंत्र्याचा पाया रचला
या हत्याकांडाने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया घातला यात शंका नाही. गांधीजींच्या असहकार आंदोलनाला भारतीय जनतेच्या प्रत्येक वर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याने स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. जिथे नवीन लोक चळवळीत सामील झाले. नेत्यांचा आत्मविश्वास खूप वाढला 

सर्वत्र तरुणाईचा रोष
1920 च्या दशकात उत्तर भारतात झालेल्या सर्व क्रांतिकारी चळवळी आणि घटनांमागे जालियनवाला बागची घटना कारणीभूत आहे, ज्यामुळे रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आपल्या क्रांतिकारी पक्षात अनेक लोकांना भरती करू शकले. त्याच वेळी काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांनी पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीवर भर दिला.

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Embed widget