एक्स्प्लोर

RTMNU Admission : महाविद्यालयात प्रवेशासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पदव्युत्तर विभागात प्रवेशाच्या पीईईसाठी आता विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल. शिवाय विद्यापीठाने परीक्षेची तारीखही वाढविली आहे. 11 ऑगस्टला होणारी पीईई परीक्षा आता 18ऑगस्टला होईल.

नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी 8 जूनपासून प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार 1 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत होती. मात्र, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने व विद्यापीठाकडे मागणी केल्याने विद्यापीठाने पदवी प्रवेशासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

पदवी प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची होती. त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेणे आवश्यक होते. मात्र नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यापीठाने पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. पदवी प्रथम वर्षांच्या प्रवेशापूर्वी सामान्यतः अभियांत्रिकी, कृषी व औषधनिर्माण शास्त्र प्रवेशासाठी सामायिक परीक्षा घेतली जाते. यावर्षी मात्र सीईटी झाली नसल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी पदवी अभ्याक्रमात प्रवेश घेतले नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. यासोबतच प्रवेशाबाबत महाविद्यालयात व विद्यापीठाकडे विचारणा केली जात आहे.

सीईटीनंतर प्रवेशाला वेग

एमएचसीईटी परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षेच्या निकालानंतर प्रवेशाला सुरुवात होणार आहे. विशेषतः कृषी अभ्यासक्रमात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी बीएसस्सीमध्ये प्रवेश घेतात. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे बीएसस्सीचे प्रवेश लांबतात. याशिवाय अभियांत्रिकीच्या सीईटी व नीट नंतरही बी.एसस्सी.मध्ये प्रवेश घेतले जातात. यामुळे विद्यापीठाने वाढवून दिलेल्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होतात.

पीजीपीईई नोंदणीलाही मुदतवाढ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागासाठी यावर्षी प्रवेशपूर्व परीक्षा (प्री एन्ट्रान्स एक्झान-पीईई) घेतली जाणार आहे. मात्र विद्यापीठाच्या अनेक विभागात प्रवेशासाठी पीईई घेता येतील येवढीही नोंदणी झाली नसल्याने विद्यापीठाने नोंदणीला पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

विद्यापीठाने यावर्षीपासून संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय पद्धत बंद केली. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर प्रवेशासाठी आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता असली तरी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयात प्रवेश झाले असल्याचे नोंदणीवरुन दिसून येते. यामुळेच विद्यापीठाला पीईईचे नव्याने सुधारित वेळापत्रक जारी करावे लागले आहे. यामुळे विद्यापीठाने घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पदव्युत्तर विभागात प्रवेशाच्या पीईईसाठी आता विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल. शिवाय विद्यापीठाने परीक्षेची तारीखही वाढविली आहे. 11 ऑगस्टला होणारी पीईई परीक्षा आता 18ऑगस्टला होईल. परीक्षेचा निकाल 22 ऑगस्टला जाहीर केला जाईल. तर 28 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार असून 1 सप्टेंबरपासून वर्ग सुरू होतील.

म्हणून मुदतवाढ

विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रवेशाच्या पीईईसाठी 1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात झाली. 7 ऑगस्टपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत होती. अंतिम मुदतीपर्यंत विद्यापीठातील 2 हजार 600 जागांसाठी 1 हजार 800 अर्ज आले. विशेष म्हणजे मानव्यशास्त्र विभागाच्या 2 हजार 200 जागांसाठी केवळ 700 तर विज्ञान विभागाच्या 400 जागांसाठी 1 हजार 100 अर्ज प्राप्त झाले.

Maharashtra Cabinet Expansion : तर अकेला बच्चू कडू काफी है, मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भात उष्णतेची लाट कायम! तापमानाचा पारा 47 अंशाच्या जवळ, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
विदर्भात उष्णतेची लाट कायम! तापमानाचा पारा 47 अंशाच्या जवळ, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
Ebola Virus In India : इबोलाच्या भीतीने सरकारच्या सावध पवित्रा; युगांडावरुन नागपूर एअरपोर्टवर उतरलेल्या 'त्या' व्यक्तीला बाजूला केलं, 21 दिवस होम आयसोलेशन
इबोलाच्या भीतीने सरकारच्या सावध पवित्रा; युगांडावरुन नागपूर एअरपोर्टवर उतरलेल्या 'त्या' व्यक्तीला बाजूला केलं, 21 दिवस होम आयसोलेशन
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
Nagpur Crime News: 'क्या रे जॉनी' म्हणत डोक्यावर टपली मारताच संतापला, नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाला संपवलं; दुचाकीवरून आला अन्...
'क्या रे जॉनी' म्हणत डोक्यावर टपली मारताच संतापला, नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून तरुणाला संपवलं; दुचाकीवरून आला अन्...

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget