एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: 'धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?', 'त्या' वक्तव्यावरुन विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न, आता म्हणतात...

Vijay Wadettiwar On Pahalgam Attack : विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावरती टीक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण दिलं आहे.

नागपूर: जम्मू काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यंटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली होती. त्यावरून एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच दुसरीकडे या मुद्यावरून राजकारणाला देखील तोंड फुटलं. याचदरम्यान, राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?' असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतर वडेट्टीवार यांच्यावरती टीका झाल्यानंतर यावरती स्पष्टीकरण दिलं आहे. 

स्पष्टीकरण देताना काय म्हणालेत वडेट्टीवार?

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरती सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आले आहे. मागचं पुढचं दाखवण्यात आलं नाही. अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर काहीतरी वेगळं वातावरण देशात निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक मीडिया जाणून बुजून करत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे जी राहुलजी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलेली आहे. ती आमच्या पक्षाची आहे. मी काल बोलताना असे बोलललो होतो, पहिल्यांदा असं होत आहे की, अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला. तेवढेच दाखवलं गेलं. त्यापुढे बोललो माझी सगळ्या चॅनलला विनंती आहे की पूर्ण दाखवा यावेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानने पाठवले, असंही पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

देशाला अस्थिर करण्यासाठी, देशातील दोन सामुदायांना आपापसात लढवण्यासाठी आणि देशाचं नुकसान करण्यासाठी पाकिस्तानने हे कृत्य केलं आहे. भारत देशाला अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शक्तींवर कारवाई करणाऱ्या केंद्र सरकारसोबत काँग्रेस उभी असेल असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. धर्म विचारून मारलं गेलं. हा देश कमजोर करायचा प्रयत्न केला गेला. एकात्मतेला, सार्वभौमत्वला, अखंडतेला खिंडार पाडायचं होतं म्हणून त्यांनी असं केलं, अतिरेक्याला कोणता धर्म नसतो. हे मी बोललो होतो. त्याच्या मागे पाकिस्तानचा जो उद्देश होता तो भारताला कमजोर करण्याचा होता. हा हल्ला भारतावरचा होता, म्हणून शिकवून पाठवलं. 26 वर्षानंतर पर्यटकांवर हल्ला होता. हे लपवण्याकरता माझं भाषण तोडून मोडून दाखवण्यात आलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

मी माफी मागतोय. मीडियाला माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा.अर्धवट दाखवू नका. सरकारचं अपयश लपवण्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये, माझी भूमिका स्पष्ट होती. अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारत आहे. अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला शिकवून पाठवलं गेलं. देशातील दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करण्याचा आणि देश कमजोर करण्याचं काम पाकिस्तानचं होतं, असं माझं मत आहे, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? मारणाऱ्याच्या कानात जाऊन तू हिंदू आहेस की मुस्लिम असं विचारण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? या प्रकरणात वेगवेगळे लोक वेगवेगळे दावे करत आहेत. काही जण असं घडल्याचं सांगत आहेत. तर काही जण असं घडलं नसल्याचं सांगत आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले होते. 

पहलगाममध्ये जे काही घडलं आहे, त्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, तुमची गुप्तचर यंत्रणा काय काम करत होती. 200 किलोमीटर आत येऊन दहशतवाद्यांनी लोकांना कसं काय मारलं? याबाबत कुणी काही बोलत नाही आहे. या सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. सरळ सरळ दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, अशाप्रकारच्या बाता मारून मुद्द्याला भरकटवणं चुकीचं आहे, कुठलाही धर्म नसतो, दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांना पकडून कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण देशभरात हीच भावना आहे. मात्र लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget