एक्स्प्लोर

गणपती स्पेशल गाड्यांकडे चाकरमान्यांनी पाठ का फिरवली?

कोकणात गाड्या सोडण्याच्या निर्णयांमध्ये अतिशय विलंब केल्याने चाकरमानी आधीच गावी पोहोचला. त्यामुळे या विशेष गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच उपयोग नाही, असे प्रवाशांचे मत आहे.

मुंबई : अनेक वाद आणि अडचणींना मागे टाकत कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. मात्र या रेल्वे गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच फायदा झाला नाही. याबाबतीत जर आधीपासून नियोजन करण्यात आले असते तर कदाचित चाकरमान्यांना याचा फायदा झाला असता. गणपती चार महिन्यांवर आले की मुंबईतल्या चाकरमान्यांची लगबग सुरू होते कोकण रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी. दिवस-रात्र स्टेशनवर रांगा लावून मिळेल ते तिकीट घेऊन चाकरमानी गणपतीला गावी पोहोचतात. यावर्षी मात्र कोविड-19 मुळे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असताना कोकणात जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या प्रश्नाबाबत एबीपी माझा अनेक प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि 15 ऑगस्टपासून कोकणात गाड्या सोडण्यात आल्या. मात्र काल सुटलेल्या चार गाड्यांमध्ये 6400 ऐवजी फक्त 1048 प्रवासी प्रवास करत होते. 15 ऑगस्टला मुंबईतून कोकणात गेलेल्या ट्रेन्सची केवळ 20 टक्के सीट्स बुकिंग झाल्याचं चित्र समोर आलं आहे. सेकंड आणि थर्ड एसीच्या बोगी रिकाम्या असल्याची माहिती आहे.

रेल्वेचा तोटा किती?

सीएसएमटी ते सावंतवाडी ही संपूर्ण 24 डब्यांची गाडी जर पूर्णपणे रिझर्व्ह झाली असती तर रेल्वेला आठ ते नऊ लाखांचे तिकिटांची उत्पन्न मिळाले असते. मात्र काल ज्या गाड्या गेल्या त्यातून केवळ 50 ते 60 हजार रुपये तिकिटाचे रेल्वेला मिळाले.

एक गाडी चालवण्यास रेल्वेला किती खर्च येतो?

कोणतीही लांब पल्ल्याची गाडी चालवायची असेल तर त्यामध्ये वेगवेगळे खर्च असतात. ऑपरेशनल कॉस्ट सर्वात महत्वाची असते. त्यानंतर ट्रॅक मेंटेनन्स कॉस्ट, कोच मेंटेनन्स कॉस्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खर्च त्यामध्ये असतात. हे सर्व सोडून कर्मचाऱ्यांचे पगार देखील यामध्ये ग्राह्य धरावे लागतात. हा सर्व खर्च मिळून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त असतो.

कोकणात गाड्या सोडण्याच्या निर्णयांमध्ये अतिशय विलंब केल्याने चाकरमानी आधीच गावी पोहोचला. त्यामुळे या विशेष गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच उपयोग नाही, असे प्रवाशांचे मत आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण 182 रेल्वेच्या फेऱ्या मुंबई ते कोकण दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी देखील मोठा वाद निर्माण झाला होता. कोकणात सर्वाधिक 162 गाड्या मध्य रेल्वे चालवणार आहे. मात्र याबद्दल मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रक काढून आमचे नियोजन झाले असून राज्य सरकारनेच अंतिम परवानगी न दिल्याने कोकणातली गाड्या रखडल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि अखेर 15 ऑगस्टपासून गाड्या सुरू करा, असे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले.

एकीकडे एसटीने जायचे असेल तर कोविड-19 चाचणी करणे बंधनकारक केल्याने एसटीने जाणारा प्रवासी वर्ग कोकणात जाणाऱ्या या विशेष गाड्यांकडे वळेल असे राज्य सरकारला वाटत होते मात्र तसे झाले नाही. रेल्वे सुटणार की नाही याबाबत साशंकता असल्याने, कुणी खाजगी बसने कुणी खाजगी वाहन करून तर कुणी एसटीने कोकणात पोहोचले आहेत. त्यामुळे गणपती विशेष गाड्यांना यावर्षी प्रतिसाद मिळत नाही.

गणपती विशेष गाड्या प्रतिसाद न मिळण्याची काही कारणं आहेत. या गाड्या ज्या आता सोडण्यात आलेल्या आहेत त्या एक महिनाभर आधीपासून नियोजन करून सोडले असत्या तर चाकरमानी रेल्वेतून गावी पोहोचला असता. दुसरे कारण आता जर गावी गेले कारण क्वॉरंटाईनचे दिवस संपेपर्यंत गणपतींचे विसर्जन होईल. त्यामुळे जाऊन फायदा होणार नाही. जर श्रमिक स्पेशल ट्रेन ने इतर राज्यातील प्रवाशांना मोफत सोडण्यात येते तर आपल्याच राज्यातील आपल्याच लोकांना पैसे भरून प्रवास का असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व कारणांमुळे विशेष गाड्या सोडूनही चाकरमानी त्यांच्याकडे फिरकला नाही. त्याचा खूप मोठा तोटा रेल्वेला सहन करावा लागणार आहे.

कोकणी माणसा कोरोनाक घाबरणारी नाय, गणपती इले की गावी जाऊचा, इतकाच त्यांका माहीत, यावर्षी पण जातले होते गावाक पण सरकार नी घोळ केलो त्यामुळे चाकरमान्यांची पंचाईत झाली, पण कोकणी माणसा कोणाक दोष देऊचे न्हाय, उलट त्या गणपती कडे गाऱ्हाना घालतील, बा देवा महाराजा, पुढल्या वर्षी तरी या सरकारला वाईज लवकर जाग येऊ दे रे महाराजा!!!

Konkan Special Railway | कोकणात जाणारी गणेशोत्सव स्पेशल ट्रेन चक्क रिकामी! 18 डब्ब्यांमध्ये केवळ 62 प्रवाशांचं बुकिंग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget