एक्स्प्लोर

गणपती स्पेशल गाड्यांकडे चाकरमान्यांनी पाठ का फिरवली?

कोकणात गाड्या सोडण्याच्या निर्णयांमध्ये अतिशय विलंब केल्याने चाकरमानी आधीच गावी पोहोचला. त्यामुळे या विशेष गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच उपयोग नाही, असे प्रवाशांचे मत आहे.

मुंबई : अनेक वाद आणि अडचणींना मागे टाकत कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. मात्र या रेल्वे गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच फायदा झाला नाही. याबाबतीत जर आधीपासून नियोजन करण्यात आले असते तर कदाचित चाकरमान्यांना याचा फायदा झाला असता. गणपती चार महिन्यांवर आले की मुंबईतल्या चाकरमान्यांची लगबग सुरू होते कोकण रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी. दिवस-रात्र स्टेशनवर रांगा लावून मिळेल ते तिकीट घेऊन चाकरमानी गणपतीला गावी पोहोचतात. यावर्षी मात्र कोविड-19 मुळे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असताना कोकणात जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या प्रश्नाबाबत एबीपी माझा अनेक प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि 15 ऑगस्टपासून कोकणात गाड्या सोडण्यात आल्या. मात्र काल सुटलेल्या चार गाड्यांमध्ये 6400 ऐवजी फक्त 1048 प्रवासी प्रवास करत होते. 15 ऑगस्टला मुंबईतून कोकणात गेलेल्या ट्रेन्सची केवळ 20 टक्के सीट्स बुकिंग झाल्याचं चित्र समोर आलं आहे. सेकंड आणि थर्ड एसीच्या बोगी रिकाम्या असल्याची माहिती आहे.

रेल्वेचा तोटा किती?

सीएसएमटी ते सावंतवाडी ही संपूर्ण 24 डब्यांची गाडी जर पूर्णपणे रिझर्व्ह झाली असती तर रेल्वेला आठ ते नऊ लाखांचे तिकिटांची उत्पन्न मिळाले असते. मात्र काल ज्या गाड्या गेल्या त्यातून केवळ 50 ते 60 हजार रुपये तिकिटाचे रेल्वेला मिळाले.

एक गाडी चालवण्यास रेल्वेला किती खर्च येतो?

कोणतीही लांब पल्ल्याची गाडी चालवायची असेल तर त्यामध्ये वेगवेगळे खर्च असतात. ऑपरेशनल कॉस्ट सर्वात महत्वाची असते. त्यानंतर ट्रॅक मेंटेनन्स कॉस्ट, कोच मेंटेनन्स कॉस्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खर्च त्यामध्ये असतात. हे सर्व सोडून कर्मचाऱ्यांचे पगार देखील यामध्ये ग्राह्य धरावे लागतात. हा सर्व खर्च मिळून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त असतो.

कोकणात गाड्या सोडण्याच्या निर्णयांमध्ये अतिशय विलंब केल्याने चाकरमानी आधीच गावी पोहोचला. त्यामुळे या विशेष गाड्यांचा कोकणवासीयांना काहीच उपयोग नाही, असे प्रवाशांचे मत आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण 182 रेल्वेच्या फेऱ्या मुंबई ते कोकण दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी देखील मोठा वाद निर्माण झाला होता. कोकणात सर्वाधिक 162 गाड्या मध्य रेल्वे चालवणार आहे. मात्र याबद्दल मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रक काढून आमचे नियोजन झाले असून राज्य सरकारनेच अंतिम परवानगी न दिल्याने कोकणातली गाड्या रखडल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि अखेर 15 ऑगस्टपासून गाड्या सुरू करा, असे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले.

एकीकडे एसटीने जायचे असेल तर कोविड-19 चाचणी करणे बंधनकारक केल्याने एसटीने जाणारा प्रवासी वर्ग कोकणात जाणाऱ्या या विशेष गाड्यांकडे वळेल असे राज्य सरकारला वाटत होते मात्र तसे झाले नाही. रेल्वे सुटणार की नाही याबाबत साशंकता असल्याने, कुणी खाजगी बसने कुणी खाजगी वाहन करून तर कुणी एसटीने कोकणात पोहोचले आहेत. त्यामुळे गणपती विशेष गाड्यांना यावर्षी प्रतिसाद मिळत नाही.

गणपती विशेष गाड्या प्रतिसाद न मिळण्याची काही कारणं आहेत. या गाड्या ज्या आता सोडण्यात आलेल्या आहेत त्या एक महिनाभर आधीपासून नियोजन करून सोडले असत्या तर चाकरमानी रेल्वेतून गावी पोहोचला असता. दुसरे कारण आता जर गावी गेले कारण क्वॉरंटाईनचे दिवस संपेपर्यंत गणपतींचे विसर्जन होईल. त्यामुळे जाऊन फायदा होणार नाही. जर श्रमिक स्पेशल ट्रेन ने इतर राज्यातील प्रवाशांना मोफत सोडण्यात येते तर आपल्याच राज्यातील आपल्याच लोकांना पैसे भरून प्रवास का असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व कारणांमुळे विशेष गाड्या सोडूनही चाकरमानी त्यांच्याकडे फिरकला नाही. त्याचा खूप मोठा तोटा रेल्वेला सहन करावा लागणार आहे.

कोकणी माणसा कोरोनाक घाबरणारी नाय, गणपती इले की गावी जाऊचा, इतकाच त्यांका माहीत, यावर्षी पण जातले होते गावाक पण सरकार नी घोळ केलो त्यामुळे चाकरमान्यांची पंचाईत झाली, पण कोकणी माणसा कोणाक दोष देऊचे न्हाय, उलट त्या गणपती कडे गाऱ्हाना घालतील, बा देवा महाराजा, पुढल्या वर्षी तरी या सरकारला वाईज लवकर जाग येऊ दे रे महाराजा!!!

Konkan Special Railway | कोकणात जाणारी गणेशोत्सव स्पेशल ट्रेन चक्क रिकामी! 18 डब्ब्यांमध्ये केवळ 62 प्रवाशांचं बुकिंग

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
Embed widget