एक्स्प्लोर

मुंबई मेट्रोसाठी पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, कोर्टाने सुनावलं

मेट्रो रेल प्राधिकरणाच्या वतीने केलेल्या झाडांच्या पुनर्लागवडीमध्ये सातशेहून अधिक झाडं मृत झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई : मेट्रो रेलचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असला तरी त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास किंवा हानी होता कामा नये, याची खबरदारी मेट्रो रेल्वे प्राधिकरणाने घ्यायला हवी, अशी ताकिद मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. मेट्रोच्या कामाअंतर्गत छाटण्यात आलेल्या झाडांची पुनर्लागवड रितसर होत नसल्याबद्दल न्यायालयीन समितीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. पर्यावरणप्रेमी झोरु भटेना यांनी मुंबईत मेट्रोसाठी केलेल्या वृक्षतोडीविरोधात याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे न्यायालयाच्या विशेष सभागृहात सुनावणी झाली. मेट्रोच्या कामादरम्यान आतापर्यंत दक्षिण मुंबईतील सुमारे 2800 झाडांची कटाई करण्यात आली आहे. या झाडांची पुनर्लागवड करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. मात्र मेट्रो रेल प्राधिकरणाच्या वतीने केलेल्या झाडांच्या पुनर्लागवडीमध्ये सातशेहून अधिक झाडं मृत झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. एकूण 1462 झाडांची पुर्नलागवड करण्यात आली होती. त्यापैकी 759 झाडे मृत झाली आहेत, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मात्र एमएमआरसीने या दाव्यास विरोध केला आहे. यातील अनेक झाडे मृत नसून ती पुनर्जीवित होऊ शकतात, असं यावेळी सांगण्यात आलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये झाडांच्या पुनर्लागवडीचे काम सुरु आहे, असा दावाही एमएमआरसीएलने केला. 'मेट्रो ही मुंबईसाठी महत्वाची असली तरी पर्यावरणाबाबत महामंडळाने संवेदनशील असायला हवं', असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. झाडांचं पुनर्रोपण करणं अत्यावश्‍यक आहे, जिओ मोजणीद्वारे त्यांची नोंद व्हायला हवी, वृक्षतोड करताना आणि त्यांची पुनर्रोपण करताना व्हिडिओग्राफी होणे आवश्‍यक आहे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार येत्या सहा आठवड्यांत जिओ मोजणीचे काम सुरु करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. त्याचबरोबर कापलेल्या झाडांच्या पुनर्लागवडीमध्ये काम करणाऱ्या सात जबाबदार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नावे एका आठवड्यात दाखल करण्याचे निर्देशही न्यायलयाने दिले आहेत. दिलेल्या निर्देशांनुसार अजूनही तीन हजार झाडांची लागवड बाकी असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मृत झाडांची रांग लागलेली आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. याचिकेवर पुढील सुनावणी सहा आठवड्यांनी होणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Marathi Compulsory Auto Taxi: रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार

व्हिडीओ

Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget