एक्स्प्लोर

माझा कट्टा | मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्राचा कोणताही प्रयत्न नाही, IFSC सेंटर प्रकरणावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत. महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा. केंद्र सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं.

मुंबई : आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गांधीनगर येथे हलवण्याचा निर्णय केव्हा झाला एकदा पाहिलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार हा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला नसावा. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रयत्न नाही. याउलट मुंबईच्या आणखी विकासाकरता केंद्र सरकारने वेळोवेळी अनेक योजना आणल्या आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.

अशा प्रकरची राजकीय चर्चा योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत. महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा. केंद्र सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी आहे. राजकारण करण्यासाठी भविष्यात खूप वेळ आहे. सध्या कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

कोरोनाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोना व्हायरसचा प्रादर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता बाळगली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत. देशातील राष्ट्रीय महामार्ग सुरु झाले आहेत, आयात-निर्यात सुरु झाली आहे, उद्योगधंदे सुरु करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जात आहे, काही रेल्वे गाड्याही सोडल्या आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढताना जीवन कसं जगायचं हे शिकणेही आवश्यक आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत

मुंबई तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेली आहे, त्यामुळे याठिकाणी काही मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत. त्यासाठी मुंबईतील उद्यागांचं विकेंद्रीकरण करणे गरजेचं आहे. मुंबईत बाहेरुन लोक ज्या पद्धतीने येतात आणि राहतात ते आदर्श नाही. यामुळे मुंबईचा धोका वाढत आहे. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन मुंबईच्या विकासाचा आणि भविष्याचा विचार सर्व राजकीय मंडळींनी केला पाहिजे. भविष्यातील मुंबई कशी असावी यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे. मुंबईतील काही उद्योग ठाणे आणि ठाण्यातील ग्रामीण भागात, कोकणात हलवले पाहिजेत. याशिवाय नवीन शहरं विकासीत करण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींनी पुढे आलं पाहिजे. मी मुंबई किंवा पुण्याच्या विरोधात नाही, मात्र अडचणी लक्षाच घेऊन पुढची योजना ठरवली पाहिजे असं माझं मत आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड करावी

शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याच्या मालाला मार्केट उभं करुन देणे गरजेचं आहे. देशात अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी गहू, तांदूळ, कापसाला पर्याय म्हणून तेलबियांची लागवड करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तेलबियांची लागवड करुन महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवी दिशा देता येईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Mumbai Crime News: मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; नराधमाने मुलीला एकटं पाहिलं अन्...
मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; नराधमाने मुलीला एकटं पाहिलं अन्...

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Banerjee Attack Allegation: कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, FPI ने मे महिन्यात 33 हजार कोटी काढून घेतले
विदेशी गुंतवणूकदारांचा मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, 33 हजार कोटी काढून घेतले
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Embed widget