एक्स्प्लोर

माझा कट्टा | मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्राचा कोणताही प्रयत्न नाही, IFSC सेंटर प्रकरणावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत. महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा. केंद्र सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं.

मुंबई : आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गांधीनगर येथे हलवण्याचा निर्णय केव्हा झाला एकदा पाहिलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार हा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला नसावा. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रयत्न नाही. याउलट मुंबईच्या आणखी विकासाकरता केंद्र सरकारने वेळोवेळी अनेक योजना आणल्या आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.

अशा प्रकरची राजकीय चर्चा योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत. महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा. केंद्र सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी आहे. राजकारण करण्यासाठी भविष्यात खूप वेळ आहे. सध्या कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

कोरोनाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोना व्हायरसचा प्रादर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता बाळगली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत. देशातील राष्ट्रीय महामार्ग सुरु झाले आहेत, आयात-निर्यात सुरु झाली आहे, उद्योगधंदे सुरु करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जात आहे, काही रेल्वे गाड्याही सोडल्या आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढताना जीवन कसं जगायचं हे शिकणेही आवश्यक आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत

मुंबई तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेली आहे, त्यामुळे याठिकाणी काही मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत. त्यासाठी मुंबईतील उद्यागांचं विकेंद्रीकरण करणे गरजेचं आहे. मुंबईत बाहेरुन लोक ज्या पद्धतीने येतात आणि राहतात ते आदर्श नाही. यामुळे मुंबईचा धोका वाढत आहे. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन मुंबईच्या विकासाचा आणि भविष्याचा विचार सर्व राजकीय मंडळींनी केला पाहिजे. भविष्यातील मुंबई कशी असावी यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे. मुंबईतील काही उद्योग ठाणे आणि ठाण्यातील ग्रामीण भागात, कोकणात हलवले पाहिजेत. याशिवाय नवीन शहरं विकासीत करण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींनी पुढे आलं पाहिजे. मी मुंबई किंवा पुण्याच्या विरोधात नाही, मात्र अडचणी लक्षाच घेऊन पुढची योजना ठरवली पाहिजे असं माझं मत आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड करावी

शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याच्या मालाला मार्केट उभं करुन देणे गरजेचं आहे. देशात अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी गहू, तांदूळ, कापसाला पर्याय म्हणून तेलबियांची लागवड करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तेलबियांची लागवड करुन महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवी दिशा देता येईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget