एक्स्प्लोर

माझा कट्टा | मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्राचा कोणताही प्रयत्न नाही, IFSC सेंटर प्रकरणावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत. महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा. केंद्र सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं.

मुंबई : आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गांधीनगर येथे हलवण्याचा निर्णय केव्हा झाला एकदा पाहिलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार हा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला नसावा. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रयत्न नाही. याउलट मुंबईच्या आणखी विकासाकरता केंद्र सरकारने वेळोवेळी अनेक योजना आणल्या आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.

अशा प्रकरची राजकीय चर्चा योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत. महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा. केंद्र सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी आहे. राजकारण करण्यासाठी भविष्यात खूप वेळ आहे. सध्या कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

कोरोनाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोना व्हायरसचा प्रादर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता बाळगली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत. देशातील राष्ट्रीय महामार्ग सुरु झाले आहेत, आयात-निर्यात सुरु झाली आहे, उद्योगधंदे सुरु करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जात आहे, काही रेल्वे गाड्याही सोडल्या आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढताना जीवन कसं जगायचं हे शिकणेही आवश्यक आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत

मुंबई तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेली आहे, त्यामुळे याठिकाणी काही मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत. त्यासाठी मुंबईतील उद्यागांचं विकेंद्रीकरण करणे गरजेचं आहे. मुंबईत बाहेरुन लोक ज्या पद्धतीने येतात आणि राहतात ते आदर्श नाही. यामुळे मुंबईचा धोका वाढत आहे. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन मुंबईच्या विकासाचा आणि भविष्याचा विचार सर्व राजकीय मंडळींनी केला पाहिजे. भविष्यातील मुंबई कशी असावी यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे. मुंबईतील काही उद्योग ठाणे आणि ठाण्यातील ग्रामीण भागात, कोकणात हलवले पाहिजेत. याशिवाय नवीन शहरं विकासीत करण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींनी पुढे आलं पाहिजे. मी मुंबई किंवा पुण्याच्या विरोधात नाही, मात्र अडचणी लक्षाच घेऊन पुढची योजना ठरवली पाहिजे असं माझं मत आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड करावी

शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याच्या मालाला मार्केट उभं करुन देणे गरजेचं आहे. देशात अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी गहू, तांदूळ, कापसाला पर्याय म्हणून तेलबियांची लागवड करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तेलबियांची लागवड करुन महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवी दिशा देता येईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget