एक्स्प्लोर

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीच्या 1000 बसेस बेस्टच्या मदतीला 

मुंबई उपनगर आणि मुंबई शेजारीच असणार्‍या जिल्ह्यांमधून दररोज अनेकजण मुंबईत कामासाठी येत असतात. सध्या लोकल बंद असल्यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. दररोजच्या प्रवासात येण्या-जाण्यासाठी सहा ते सात तास जात असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरं आणि मुंबई शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांमधून मुंबईत नोकरीसाठी लाखो लोक दररोज येत आहेत. सध्या कोरोनामुळे लोकल सेवा बंद असल्यामुळे या नागरिकांचा वेळ प्रवासात अधिक जात आहे. त्यातून त्यांचे हालही मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्रवाशांसाठी मुबलक बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्ट प्रशासनानं एसटी महामंडळाकडे 1000 एसटी बसची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत महामंडळाने बेस्ट प्रशासनाकडे 1000 बसेस पैकी तीनशे एसटी बसेस दिल्या आहेत. या बसेस मुंबईत दाखल झाल्या असून मुंबईकरांना थोडा दिलासा मिळालेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या देश अनलॉकच्या दिशेने जात असून महाराष्ट्रासह मुंबईतील प्रशासकीय कार्यालये आणि खासगी कार्यालये हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मुंबई शहरामध्ये कामासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे अधिकारी, कर्मचारी मुंबई बाहेरील उपनगर आणि मुंबई शेजारीच असणार्‍या जिल्ह्यांमधून दररोज मुंबईत कामासाठी येत असतात. सध्या लोकल बंद असल्यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. दररोजच्या प्रवासात येण्या-जाण्यासाठी सहा ते सात तास जात असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसेच बेस्टच्या बसेस या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी कमी पडत असल्याने राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासनाच्या वतीने एसटी महामंडळाकडे या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी 1000 बसेसची मागणी केली होती.

एसटी महामंडळाने सध्या 1000 बसेस पैकी 300 बसेस पहिल्या टप्प्यात मुंबईकरांच्या प्रवासासाठी दिलेल्या आहेत. या एसटी बसेस मुंबई शहर व उपनगरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी बेस्ट बसेसचे थांबे आहेत. त्या ठिकाणाहून प्रवाशांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी सेवा देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत.

प्रवास मार्ग

1) विरार नालासोपारा ते मुंबई

2) अंबरनाथ, कल्याण - डोंबिवली ते मुंबई

3) खोपोली, पनवेल ते मुंबई

या प्रमुख मार्गासह मुंबई शहर आणि उपनगरातील हजारो थांब्यांवर या एसटी बसेस थांबून प्रवाशांची ने-आण करणार आहेत.

कोरोनाच्या काळात सुरुवातीला एसटी बसेस देखील बंद होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिली. सध्या राज्यातील इतर ठिकाणी जरी वाहतूक कमी असली तरी त्याच्या तुलनेत मुंबई उपनगर आणि शेजारीच असणार्‍या जिल्ह्यातील प्रवाशांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांना दररोज ने-आण करण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या बसेस कमी पडत असून प्रवाशांचे हाल रोखण्यासाठी महामंडळाने बेस्टच्या मदतीला 1000 एसटी बसेस देण्याचे मान्य केले आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने रस्त्यावर उतरणार असून पहिल्या टप्प्यात 300 दुसऱ्या टप्प्यात 200 आणि तिसर्‍या टप्प्यात गरजेनुसार उर्वरित बस मुंबईच्या रस्त्यांवर धावण्याचं नियोजन करण्यात आलेला आहे. प्रवास आणि मार्ग याचं नियोजन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलं असून एसटी महामंडळ आपल्या बसेस आणि कर्मचारी या सेवेसाठी पूर्वत आहे. यातून एसटी महामंडळाला देखील उत्पन्न मिळणार असून लॉकडाऊनमुळे महामंडळाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी असे नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत, असं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्‍ने यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget