एक्स्प्लोर

सत्तेतले एकत्र पक्ष निवडणुकीत वेगवेगळेही लढतात : सुनील तटकरे

मुंबईतील ठाकरे स्मारकात गुरुवारी (23 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तासभर बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात भविष्यात रायगड पॅटर्नची चर्चा सुरु झाली. मात्र सत्तेतले पक्ष स्थानिक निवडणुका वेगवेगळ्या लढल्याचा इतिहास आहे, असं सुनील तटकरे म्हणाले.

मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकावर काल (23 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती जी बैठक झाली त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. या बैठकीचं नियोजन राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात समन्वय राहावा, यासाठी आयोजित केलं होतं. कारण हे पक्ष राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असले तरी स्थानिक पातळीवरचे संबंध आजही तेवढे चांगले नाहीत.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. या तीन आमदारांसोबत राष्ट्रवादीचं फारसं पटत नव्हतं. म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचं नियोजन केलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक एन्ट्रीने शिवसेनेचे आमदार दचकले, कारण बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार होती एवढीच माहिती शिवसेना आमदारांना होती

सत्तेत एकत्र पण, निवडणुकीत वेगवेगळे आतापर्यंत शिवसेना, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल, सत्तेत जरी एकत्र असले तर स्थानिक निवडणुका वेगवेगळ्या लढल्याचा इतिहास आहे, असं मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. 2009, 2014 आणि 2019 साली निवडणुक वेगवेगळं चित्र पाहायल मिळालं. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत वेगवेगळे लढलेले दिसले. त्यामुळे आतापर्यंत सत्तेत जरी दोन पक्ष एकत्र असले निवडणुका वेगवेगळ्या लढले गेल्याचा इतिहास आहे.

काँग्रेसचं काय होणार? कालच्या बैठकीनंतर दोन प्रादेशिक पक्ष एकत्र येणार यावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. पण भविष्यात निवडणुकांचा निर्णय घेताना शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी निर्णय घेतील तोच अंतिम राहिल आणि स्थानिक पातळींवर कार्यकर्त्यांचं मत विश्वासात घेणं गरजेचं आहे. ते मत लक्षात घेतल्यानंतर निर्णय घेतले जाऊ शकतात पण तूर्तास कुठल्याही निवडणुका नाही, सध्या काँग्रेस आमच्यासोबत आहे, भविष्यातही एकत्र राहू, असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

बैठकीत काय काय घडलं? महाविकास आघाडी असमन्वय असल्याचं वारंवार दिसून येतं, तसाच या बैठकीतही दिसून आला. रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे हे आम्हाला विश्वासात घेत नाहीत. पालकमंत्री नेमकं कोण आहे? अशी तक्रार शिवसेनेचा आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार राष्ट्रावादीसोबत जुळवून घेत नाहीत असा सूर तटकरेंकडून आला. त्यामुळे एकंदरीत रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत फारसं आलबेल नसल्याने या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. पण त्यावर उद्धव ठाकरेंनी तोडगा काढला कारण एक मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून अशा अनेक तक्रारी येत असतात पण त्यावर सहज तोडगा काढण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यश आलं.

समन्वय राखा, मुख्यमंत्र्यांचे आदेश आपण भाजपला दूर ठेऊन सगळे एकत्र आलो आहोत आपल्याला भविष्यातही एकत्र राहायचं आहे, त्यामुळे मतभेद बाजूला ठेवत एकत्र राहण्यात महाविकास आघाडीचं भलं आहे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. त्यामुळे रायगड पॅटर्नची चर्चा सुरु झाली. रायगडमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप एकत्र निवडणुका लढत होती, भविष्यात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी चर्चा सुरु झाली.

Raigad Pattern | काँग्रेला दूर ठेवण्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही : सुनील तटकरे

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget