![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Local Update : मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे रेल्वे स्थानकात लोकल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत
Thane Mumbai Local Update : पहाटेपासूनच मुंबईत पावसानं धुमाकूळ घातला आहे. अशातच मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.
![Mumbai Local Update : मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे रेल्वे स्थानकात लोकल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत Thane Mumbai Local Update Mubai rains Traffic disrupted at Thane railway station due to local Breakdown Marathi News Mumbai Local Update : मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे रेल्वे स्थानकात लोकल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/13/44a5c904d4bc8353981f92d0dd8fea001657690624_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Thane Mumbai Local Update : पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत पावसानं धुमाकूळ घातला आहे. अशातच मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. ठाणे स्थानकात लोकल बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल बंद पडली आहे. सध्या प्रशासनाकडून लोकल बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. त्यानंतर स्लो ट्रॅक सुरू होईल, याला अजून काही वेळ लागू शकतो. दरम्यान, ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेल्या बिघाडामुळे कळवा, मुंब्रा अशा स्थानकात देखील मध्य रेल्वेच्या धीम्या ट्रॅकवरील लोकल खोळंबल्या आहेत.
मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत कोसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोसळधारेमुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात जोरदार पाऊस पडतोय. तसेच, पावसाच्या संततधारेमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य, हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं धावत आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकांत रुळांवर काही प्रमाणात पाणी साचलं होतं. अशातच आता लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूकही खोळंबली आहे.
कालपासून ठाणे शहरांत प्रचंड पाऊस बरसत आहे. मुलीला पावसामुळे दरवर्षी ज्या ठिकाणी हमखास पाणी साचतं अशा वंदना सिनेमा चौकात आणि साचलेले बघायला मिळत आहे. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी सध्या कमी आहे. त्यामुळे अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास भरतीच्या वेळेस पाण्याची पातळी वाढून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊ शकतो.
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं अजूनही विश्रांती घेतली नाहीये. आज पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, कोकण, विदर्भाच्या काही भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसामुळे राज्यभर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होतेय. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग तासागणिक वाढवला जातोय. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. तिकडचे लोणावळ्यात पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन प्रशासनानं संध्याकाळी 5 नंतर भुशी धरणाकडे जाण्यास बंदी घातली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्यानं नदीकाठी नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)