एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, कळवा-विटावा रस्ता 4 दिवस बंद
कळवा-विटावा मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामामुळे पुढचे चार दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणे : ऐन वीकेन्डला ठाणे-नवी मुंबई परिसरातील प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. एकीकडे हार्बर मार्गावर रेल्वेचा जंबो ब्लॉक असताना नवी मुंबई-ठाणे रस्त्याचंही काम सुरु असल्यामुळे पुढचे चार दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
कळवा-विटावा मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामामुळे पुढचे चार दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पर्यायी मार्ग म्हणून पटणी-ऐरोली रोडने ऐरोली नॉलेज पार्क मार्गे आणि ऐरोली जंक्शन येथून पूर्व द्रुतगती महामार्गावर जाता येईल. या बंदीच्या अधिसूचनेत, पोलिस वाहनं, रुग्णवाहिका, फायरब्रिगेड, अत्यावश्यक सेवेतील तसंच या पुलाच्या कामातील वाहनांना लागू राहणार नसल्याचं ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं.
हार्बर रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक, विशेष बसची सोय
हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरु होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून काही गाड्या रद्द झाल्या असल्या तरी त्या मार्गावर स्पेशल ट्रेन्स चालवल्या आहेत. त्यामुळे आज प्रवाशांना त्रास होऊ नये असा प्रयत्न केला जात आहे, आज ट्रान्स हार्बर मात्र व्यवस्थित सुरु राहणार आहे. मार्ग जोडण्याचं काम 25 तारखेला मोठ्या प्रमाणात होणार असल्यानं त्या दिवशी मात्र मार्ग बंद राहतील.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement