एक्स्प्लोर

कार्बन डायऑक्साईडचे रुपांतर आता व्यावसायिक उपयोगाच्या रसायनामध्ये होणार; मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञान

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून कार्बन डायऑक्सईड नियंत्रणावर तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. X-Prize जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत आयआयटी मुंबईची टीम 85 लाखांच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. 

मुंबई : मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या टीमने कार्बन डायऑक्साईड नियंत्रणावर एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्सईडचे रूपांतरण व्यवसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या टीमला तब्बल 85 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. 

एक्स्प्राईज कार्बन रिमूव्हल आणि ईलॉन मस्क फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या 23 टीममध्ये आयआयटी मुंबईच्या या टीमचा सहभाग आहे. या टीममध्ये आयआयटी मुंबईतील श्रुती भामरे, श्रीनाथ ऐय्यर, अन्वेशा बॅनर्जी आणि शुभम कुमार या चार विद्यार्थ्यांचा समावेश असून प्राध्यापक अर्णब दत्त आणि प्राध्यापक विक्रम विशाल यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पृथ्वीच्या सततच्या वाढत्या तापमानवाढीमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर विचार करणे गरजेचे आहे. वाढते औद्योगिकीकरण, वाहनांचा वाढत वापर, शेतीमध्ये वापरला जाणारा रसायनांचा मोठ्या प्रमाणावरील वापर, विविध इंधनांचे ज्वलन यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक कार्बन प्रमाण असंतुलित होत आहे. तापमान वाढीसाठी कार्बन डायऑक्सईडची मोठ्या प्रमाणावरील उत्सर्जन हे मुख्य कारण आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड ला नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे.

या तंत्रज्ञान निर्मितीनंतर, कार्बन उत्सर्जनानंतर त्याच्यामधून विविध रसायनांच्या निर्मितीसाठी जे व्यापक वापरासाठी उपयुक्त असतील, स्वस्त, किफायतशीर असतील आणि भरपूर काळ टिकणारी शाश्वत असतील अशा उत्पादन निर्मितीमध्ये भारत महत्त्वाची भूमिका जगात बजावू शकेल अशी प्रतिक्रिया शुभम कुमार या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान, उत्सर्जन कमी करून तापमान वाढीची समस्या कमी होणार नसून त्या कार्बन डायऑक्सईडला नियंत्रित करणे किंवा त्याचा नाश करून इतर निर्मितीला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरणार सल्ल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम विशाल यांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत या चमूची आता निवड झाली आहे. त्यांना आता त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर त्यांना अंतिम बक्षीस मिळणार आहे.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या तंत्रज्ञान ही दोन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यांत उद्योगांतून वायुरूपात असलेल्या कार्बन डायऑक्सईडला वेगळे करणे आणि दुसऱ्या टप्प्यांत त्याचे महत्त्वाच्या रसायनांमध्ये रूपांतरण करणे याचा समावेश आहे. हा पुरस्कार जिंकणारी देशातील आयआयटी मुंबई ही ही एकमेव संस्था ठरली आहे. हे पुरस्कार वातावरण, समुद्र आदी पर्यावरण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुणांना देण्याचे ठरविण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget