एक्स्प्लोर

कार्बन डायऑक्साईडचे रुपांतर आता व्यावसायिक उपयोगाच्या रसायनामध्ये होणार; मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञान

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून कार्बन डायऑक्सईड नियंत्रणावर तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. X-Prize जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत आयआयटी मुंबईची टीम 85 लाखांच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. 

मुंबई : मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या टीमने कार्बन डायऑक्साईड नियंत्रणावर एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्सईडचे रूपांतरण व्यवसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या टीमला तब्बल 85 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. 

एक्स्प्राईज कार्बन रिमूव्हल आणि ईलॉन मस्क फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या 23 टीममध्ये आयआयटी मुंबईच्या या टीमचा सहभाग आहे. या टीममध्ये आयआयटी मुंबईतील श्रुती भामरे, श्रीनाथ ऐय्यर, अन्वेशा बॅनर्जी आणि शुभम कुमार या चार विद्यार्थ्यांचा समावेश असून प्राध्यापक अर्णब दत्त आणि प्राध्यापक विक्रम विशाल यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पृथ्वीच्या सततच्या वाढत्या तापमानवाढीमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर विचार करणे गरजेचे आहे. वाढते औद्योगिकीकरण, वाहनांचा वाढत वापर, शेतीमध्ये वापरला जाणारा रसायनांचा मोठ्या प्रमाणावरील वापर, विविध इंधनांचे ज्वलन यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक कार्बन प्रमाण असंतुलित होत आहे. तापमान वाढीसाठी कार्बन डायऑक्सईडची मोठ्या प्रमाणावरील उत्सर्जन हे मुख्य कारण आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड ला नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे.

या तंत्रज्ञान निर्मितीनंतर, कार्बन उत्सर्जनानंतर त्याच्यामधून विविध रसायनांच्या निर्मितीसाठी जे व्यापक वापरासाठी उपयुक्त असतील, स्वस्त, किफायतशीर असतील आणि भरपूर काळ टिकणारी शाश्वत असतील अशा उत्पादन निर्मितीमध्ये भारत महत्त्वाची भूमिका जगात बजावू शकेल अशी प्रतिक्रिया शुभम कुमार या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान, उत्सर्जन कमी करून तापमान वाढीची समस्या कमी होणार नसून त्या कार्बन डायऑक्सईडला नियंत्रित करणे किंवा त्याचा नाश करून इतर निर्मितीला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरणार सल्ल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम विशाल यांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत या चमूची आता निवड झाली आहे. त्यांना आता त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर त्यांना अंतिम बक्षीस मिळणार आहे.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या तंत्रज्ञान ही दोन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यांत उद्योगांतून वायुरूपात असलेल्या कार्बन डायऑक्सईडला वेगळे करणे आणि दुसऱ्या टप्प्यांत त्याचे महत्त्वाच्या रसायनांमध्ये रूपांतरण करणे याचा समावेश आहे. हा पुरस्कार जिंकणारी देशातील आयआयटी मुंबई ही ही एकमेव संस्था ठरली आहे. हे पुरस्कार वातावरण, समुद्र आदी पर्यावरण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुणांना देण्याचे ठरविण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report
Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
Embed widget