एक्स्प्लोर

कार्बन डायऑक्साईडचे रुपांतर आता व्यावसायिक उपयोगाच्या रसायनामध्ये होणार; मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञान

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून कार्बन डायऑक्सईड नियंत्रणावर तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. X-Prize जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत आयआयटी मुंबईची टीम 85 लाखांच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. 

मुंबई : मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या टीमने कार्बन डायऑक्साईड नियंत्रणावर एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्सईडचे रूपांतरण व्यवसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या टीमला तब्बल 85 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. 

एक्स्प्राईज कार्बन रिमूव्हल आणि ईलॉन मस्क फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या 23 टीममध्ये आयआयटी मुंबईच्या या टीमचा सहभाग आहे. या टीममध्ये आयआयटी मुंबईतील श्रुती भामरे, श्रीनाथ ऐय्यर, अन्वेशा बॅनर्जी आणि शुभम कुमार या चार विद्यार्थ्यांचा समावेश असून प्राध्यापक अर्णब दत्त आणि प्राध्यापक विक्रम विशाल यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पृथ्वीच्या सततच्या वाढत्या तापमानवाढीमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर विचार करणे गरजेचे आहे. वाढते औद्योगिकीकरण, वाहनांचा वाढत वापर, शेतीमध्ये वापरला जाणारा रसायनांचा मोठ्या प्रमाणावरील वापर, विविध इंधनांचे ज्वलन यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक कार्बन प्रमाण असंतुलित होत आहे. तापमान वाढीसाठी कार्बन डायऑक्सईडची मोठ्या प्रमाणावरील उत्सर्जन हे मुख्य कारण आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड ला नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे.

या तंत्रज्ञान निर्मितीनंतर, कार्बन उत्सर्जनानंतर त्याच्यामधून विविध रसायनांच्या निर्मितीसाठी जे व्यापक वापरासाठी उपयुक्त असतील, स्वस्त, किफायतशीर असतील आणि भरपूर काळ टिकणारी शाश्वत असतील अशा उत्पादन निर्मितीमध्ये भारत महत्त्वाची भूमिका जगात बजावू शकेल अशी प्रतिक्रिया शुभम कुमार या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान, उत्सर्जन कमी करून तापमान वाढीची समस्या कमी होणार नसून त्या कार्बन डायऑक्सईडला नियंत्रित करणे किंवा त्याचा नाश करून इतर निर्मितीला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरणार सल्ल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम विशाल यांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत या चमूची आता निवड झाली आहे. त्यांना आता त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर त्यांना अंतिम बक्षीस मिळणार आहे.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या तंत्रज्ञान ही दोन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यांत उद्योगांतून वायुरूपात असलेल्या कार्बन डायऑक्सईडला वेगळे करणे आणि दुसऱ्या टप्प्यांत त्याचे महत्त्वाच्या रसायनांमध्ये रूपांतरण करणे याचा समावेश आहे. हा पुरस्कार जिंकणारी देशातील आयआयटी मुंबई ही ही एकमेव संस्था ठरली आहे. हे पुरस्कार वातावरण, समुद्र आदी पर्यावरण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुणांना देण्याचे ठरविण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Embed widget