एक्स्प्लोर

EVM | ईव्हीएमविरोधात 21 ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा

"ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा," असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, विद्या चव्हाण उपस्थित होते.

मुंबई : ईव्हीएमविरोधात येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ईव्हीएमविरुद्ध राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटले असून विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. तसंच बॅलेट पेपरसंदर्भात महाराष्ट्रातील घरोघरी अर्जांचं वाटप करुन त्यांचं मत जाणून घेणार आहोत, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. "ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा," असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, विद्या चव्हाण उपस्थित होते. "बॅलेट पेपरसंदर्भात आम्ही महाराष्ट्रातील घराघरात जाऊन फॉर्म भरुन घेणार आहोत. मग 21 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघेल. त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे फॉर्म देणार आहोत," असं राज ठाकरे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापुढे आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतर नेते काय म्हणाले? अजित पवार निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. जनतेला आव्हान करत आहोत त्यांनीही प्रतिसाद द्यावा. निवडणुका पारदर्शकपणे घेतल्या पाहिजे, मतदारांनाही कळलं पाहिजे, त्यांनी कोणाला मतदान केलं आहे, असं अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. तसंच अमेरिका, जपान यांनी हे तंत्रज्ञान फेकून दिले मग आपण का वापरायचे? असा सवालही त्यांनी विचारला. बाळासाहेब थोरात आमचं आंदोलन लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे, असं म्हणत ईव्हीएमबाबत समज-गैरसमज दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आणि सरकारची असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. राजू शेट्टी पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे, 21 तारखेचा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नमूद केलं. तर 15 ऑगस्ट रोजी गावसभेत ईव्हीएमविरोधात ठराव मंजूर करुन मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना केलं. बी जी कोळसे पाटील 191 पैकी फक्त 18 देशांमध्ये ईव्हीएम वापरलं जातं आणि ते छोटे देश आहेत. मोठी लोकशाही असलेल्या देशात ईव्हीएम नाहीत किंवा त्यांनी ईव्हीएम वापरणं बंद केलं आहे. त्यामुळे आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget