एक्स्प्लोर

एल्गार प्रकरणाची एसआयटीमार्फतही चौकशी होणार : नवाब मलिक

राज्य सरकार एल्गार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र सरकार एल्गार परिषद प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहे. एनआयएसोबत एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) या प्रकरणाची चौकशी होणार आहे. राज्य सरकार लवकरच एसआयटीची स्थापना करणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एल्गार प्रकरणाच्या तपासाबाबत निर्णय झाल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. गृहमंत्री अनिल देशमुख कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन एल्गार परिषद प्रकरणी एसआयटी  स्थापन करतील. एसआयटी स्थापन करण्यासंदर्भात शरद पवारांनी राज्य सरकारला पत्र दिलं होतं. राज्य सरकार एल्गार परिषदेसंदर्भात समांतर एसआयटी स्थापन करु शकतं, एनआयएच्या कलम 10 नुसार वेगळी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. भाजपला सत्तेत राहण्याचा रोग काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे एल्गार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी एल्गारचा तपास एनआयएकडे दिल्याने शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख नाराज झाले होते. त्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र आमच्यात महाराष्ट्र विकास आघाडीत कोणताही वाद नाही, भाजपाला सत्तेत राहण्याचा रोग झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वाद असल्याचाही अपप्रचार केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला. लपवण्यासारखं असेल म्हणूनच तपास एनआयएकडे : शरद पवार एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी होकार दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी लावून धरली होती. एनआयएकडून तपास करणे हा केंद्राचा अधिकार आहे, मात्र राज्याला देखील अधिकार आहेत. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे. कोरेगाव-भीमा प्रकरण घडलं त्यावेळी फडणीस सरकार होतं. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखं असेल म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला आहे, असा आरोप शरद पवारांनी केला. एल्गार परिषद प्रकरण काय आहे? हे प्रकरण पुण्याच्या शनिवारवाड्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेत कथितरित्या प्रक्षोभक भाषणाशी संबंधित आहे. या भाषणांमुळेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथे हिंसाचार झाला होता, असा दावा पोलिसांचा आहे. या परिषदेच्या आयोजनाला नक्षलवाद्यांचं समर्थन होतं. तपासाच्या वेळी पोलिसांनी डाव्या विचारसरणीच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली होती.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट, भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची सुत्रांची माहिती 
कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट, भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची सुत्रांची माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

व्हिडीओ

Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Embed widget