एक्स्प्लोर

11 लाख मतदारांची नावं कुठे, स्थायीचे महापालिकेला चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मतदारयादीतील 11 लाख जणांची नावं गहाळ झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीतही उमटले आहेत. स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ कसा झाला, तसंच 11 लाख मतदारांची नावं कुठे गेली, याची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीनं मुंबई महापालिका प्रशासानाला दिले आहेत. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यासंबंधी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. मतदार यादीतून मराठी नावंच वगळली गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर मतदार यादीत घोळ झाला नसता तर बहुमत आमचंच असतं, असा दावा भाजपने केला आहे. मतदार यादीतील घोळ प्रकरणावर भाजपच्या दिलीप पटेल यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा घेतला होता. काय आहे प्रकरण? 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मतदार यादीत नाव असलेल्यांपैकी तब्बल 11 लाख जणांची नावं यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावं लागलं. विशेषतः मालाड, घाटकोपर, वरळी, बोरीवली या ठिकाणच्या मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी विधानसभा निवडणुकीला मतदान केलं होतं, पण यावेळी नावं मतदार यादीतून वगळण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्या नियमित केल्यानंतर 11 लाख मतदारांचं नाव वगळण्यात आलं. यामध्ये काही जण मृत असल्याचं किंवा काही मुंबईत राहत नसल्याचं कारण सांगितलं गेलं. शिवसेना याप्रकरणी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. यासाठी शिवसेना भवनात टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली. यावर मतदार तक्रार नोंदवू शकतात. तसंच याप्रकरणी शिवसेनेच्या शाखांमध्येही तक्रार नोंदवता येणार आहे. या सर्व तक्रारी शिवसेना कोर्टात सादर करणार असल्याचं समजतं.

संबंधित बातम्या:

मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ, 11 लाख मतदारांची नावं गायब

मतदार यादीतील घोळाप्रकरणी शिवसेना कोर्टाचे दरवाजे ठोठावणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget