एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : घटनाबाह्य सरकार कोसळणार, हे बंड नव्हे तर माणुसकीशी गद्दारी, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा 

तुम्ही गेलात म्हणून आम्हाला राग नाही पण दु:ख आहे. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु:ख असल्याचे मत आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबाबत व्यक्त केलं.

Aaditya Thackeray : खाऊन ज्यांना अपचन झाले ते लोक शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. शिंदे गटानं केलेलं बंड नाही तर ही गद्दारी असल्याचा निशाणा युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. आपल्याला राजकारण जमलं नाही हेच चुकलं असल्याचे ते म्हणाले. जिथे गेलात तिथे आनंदात राहा. तुम्ही गेलात म्हणून आम्हाला राग नाही पण दु:ख आहे. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु:ख आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं. ज्यांना ज्यांना परत यायचे असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे असल्याचेही ते म्हणाले. हे सरकार घटनाबाह्य असून लवकरच कोसळणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
माणुसकीशी गद्दारी 

आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. या शिवसंवाद यात्रेनिमित्त भिवंडीत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा लगावला. तुमच्यात हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलं. आमदारांनी फक्त महाराष्ट्राशीच नाही तर माणुसकिशी गद्दारी केली आहे. आमच्याकडून ज्यांच्यावर अन्याय झाला ते निष्ठेने आमच्यासोबत आहेत. त्यामुळं चांगल्या लोकांना राजकारणात स्थान असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. 
 
आम्ही राजकारण केलं नाही हेच चुकलं
 
अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोणताही भेदभाव न करता विकासाची काम करत आलो. 24 तास सेवा करत आलो. या काळात आमचं चुकलं ते म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही. आपल्याला राजकारण जमलं नाही म्हणून ही वेळ आल्याते आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण केले. त्यांच्यावर अंध विश्वास ठेवला म्हणून ते गेले. मात्र, शिवसैनिकांवरचा विश्वास कायम राहणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती

जे शिवसेना सोडून गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते म्हणतायेत की आम्ही उठाव केला बंड केल. पण त्यांनी केलेलं बंड नव्हते, तर ती गद्दारी आहे. त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागला आहे. बंड आणि उठाव करायला ताकत लागते. बंड करायचे असते तर हे गुवाहाटीला पळून गेले नसते. बंड करायचे असते तर ते महाराष्ट्रात राहीले असते, पळून गेले नसते असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. 

धमकीला घाबरणार नाही

सध्या राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात पूर आलं आहे. लोक त्रस्त आहेत. शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. अशा काळात दोन लोकांचे मंत्रीमंडळ आहे. त्यामुळं हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार आहे. हे दिल्लीत बसले आहेत. महाराष्ट्रातील लोक त्रस्त असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. काही लोक युवासेनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत. त्यांच्यावर दबाबव आणत आहेत पण त्यांच्या धमकीला कोणी घाबरणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : राजकीय संघर्ष संपला? मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे उपस्थित, अनेकांना आश्चर्याचा धक्का
राजकीय संघर्ष संपला? मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे उपस्थित, अनेकांना आश्चर्याचा धक्का
राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
Sushma Andhare : दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांच्या शेजारचा तो व्यक्ती कोण? अशोक खरात प्रकरणी सुषमा अंधारेंनी नवा फोटो दाखवला
दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांच्या शेजारचा तो व्यक्ती कोण? अशोक खरात प्रकरणी सुषमा अंधारेंनी नवा फोटो दाखवला
Mumbai Dabbawala : मुंबईतील डबेवाले 6 दिवस सुट्टीवर; 'या' दरम्यान जेवणाची सेवा बंद, कारणही समोर
मुंबईतील डबेवाले 6 दिवस सुट्टीवर; 'या' दरम्यान जेवणाची सेवा बंद, कारणही समोर

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget