एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : घटनाबाह्य सरकार कोसळणार, हे बंड नव्हे तर माणुसकीशी गद्दारी, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा 

तुम्ही गेलात म्हणून आम्हाला राग नाही पण दु:ख आहे. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु:ख असल्याचे मत आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबाबत व्यक्त केलं.

Aaditya Thackeray : खाऊन ज्यांना अपचन झाले ते लोक शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. शिंदे गटानं केलेलं बंड नाही तर ही गद्दारी असल्याचा निशाणा युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. आपल्याला राजकारण जमलं नाही हेच चुकलं असल्याचे ते म्हणाले. जिथे गेलात तिथे आनंदात राहा. तुम्ही गेलात म्हणून आम्हाला राग नाही पण दु:ख आहे. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु:ख आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं. ज्यांना ज्यांना परत यायचे असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे असल्याचेही ते म्हणाले. हे सरकार घटनाबाह्य असून लवकरच कोसळणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
माणुसकीशी गद्दारी 

आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. या शिवसंवाद यात्रेनिमित्त भिवंडीत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा लगावला. तुमच्यात हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलं. आमदारांनी फक्त महाराष्ट्राशीच नाही तर माणुसकिशी गद्दारी केली आहे. आमच्याकडून ज्यांच्यावर अन्याय झाला ते निष्ठेने आमच्यासोबत आहेत. त्यामुळं चांगल्या लोकांना राजकारणात स्थान असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. 
 
आम्ही राजकारण केलं नाही हेच चुकलं
 
अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोणताही भेदभाव न करता विकासाची काम करत आलो. 24 तास सेवा करत आलो. या काळात आमचं चुकलं ते म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही. आपल्याला राजकारण जमलं नाही म्हणून ही वेळ आल्याते आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण केले. त्यांच्यावर अंध विश्वास ठेवला म्हणून ते गेले. मात्र, शिवसैनिकांवरचा विश्वास कायम राहणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती

जे शिवसेना सोडून गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते म्हणतायेत की आम्ही उठाव केला बंड केल. पण त्यांनी केलेलं बंड नव्हते, तर ती गद्दारी आहे. त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागला आहे. बंड आणि उठाव करायला ताकत लागते. बंड करायचे असते तर हे गुवाहाटीला पळून गेले नसते. बंड करायचे असते तर ते महाराष्ट्रात राहीले असते, पळून गेले नसते असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. 

धमकीला घाबरणार नाही

सध्या राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात पूर आलं आहे. लोक त्रस्त आहेत. शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. अशा काळात दोन लोकांचे मंत्रीमंडळ आहे. त्यामुळं हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार आहे. हे दिल्लीत बसले आहेत. महाराष्ट्रातील लोक त्रस्त असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. काही लोक युवासेनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत. त्यांच्यावर दबाबव आणत आहेत पण त्यांच्या धमकीला कोणी घाबरणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News : प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेणं भोवलं; कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं
प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेणं भोवलं; कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai News : फक्त फ्लॅटच्या भाड्यासाठी तब्बल 18 कोटींचा करार! मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये पुन्हा चकित करणारा व्यवहार; घर खरेदीपेक्षा भाड्याचा खर्चच अधिक चर्चेत
फक्त फ्लॅटच्या भाड्यासाठी तब्बल 18 कोटींचा करार! मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये पुन्हा चकित करणारा व्यवहार; घर खरेदीपेक्षा भाड्याचा खर्चच अधिक चर्चेत
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

व्हिडीओ

Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swami Pragyanananda Saraswati : 'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Vidhan Parishad Election 2026: पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?
पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?
Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: 'दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही...'; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला
'दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही...'; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...
भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...
Vikram Kakade Pune Vidhan Parishad Election 2026: सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
Aishwarya Shete Atta Thambvaych Kasa Marathi Play: गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
Vidhan Parishad Election 2026: 'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Embed widget