एक्स्प्लोर

Sanjay Raut Bail Granted : ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊतांना जामीन मंजूर

Sanjay Raut Bail : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे.

Sanjay Raut Bail : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. 

कोर्टात काय-काय झालं? 

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं करण्यात आला आहे. दरम्यान, जामीनाबाबत आज दुपारी 3 वाजता न्यायालय निकाल देणार आहे. 

संजय राऊतांवर आरोप काय? 

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून 

अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.

पत्रचाळ प्रकरण काय?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
हृदयद्रावक !  4 वर्षांचं  बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
हृदयद्रावक ! 4 वर्षांचं बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
हृदयद्रावक !  4 वर्षांचं  बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
हृदयद्रावक ! 4 वर्षांचं बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
राहुल गांधी केस का करु शकत नाहीत? डिसेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने कायद्यातच असा बदल की निवडणूक आयुक्तांविरुद्ध मृत्यूपर्यंत कोणताच खटला चालवू शकत नाही, केरळ काँग्रेसने कायदा दाखवला
राहुल गांधी केस का करु शकत नाहीत? डिसेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने कायद्यातच असा बदल की निवडणूक आयुक्तांविरुद्ध मृत्यूपर्यंत कोणताच खटला चालवू शकत नाही, केरळ काँग्रेसने कायदा दाखवला
Embed widget