एक्स्प्लोर

खोट्या आणि बदनामीकारक दाव्याप्रकरणी राहुल कंवल यांच्यावर कारवाई करावी, शिवसेनेची मागणी

सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या मुलाखतीवरुन ज्येष्ठ निवदेक राहुल कंवल यांनी खळबळजनक दावा केला होता. 'सेनेचे गुंड' सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचं राहुल कंवल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेने इंडिया टुडे ग्रुपच्या संस्थापकांना पत्र लिहून खोटा आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी राहुल कंवल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : शिवसेनेने वृत्तनिवदेक राहुल कंवल यांची तक्रार करणारं पत्र 'इंडिया टुडे ग्रुप'ला लिहिलं आहे. 'सेनेचे गुंड' सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचा वक्तव्य राहुल कंवल यांनी आपल्या शोमध्ये केलं होतं. परंतु हे वक्तव्य खोटं आणि बदनामीकारक असून याबाबत कारवाई करावी तसंच राहुल कंवल यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे पत्र 'इंडिया टुडे ग्रुप'चे संस्थापक अरुण पुरी यांना लिहिलं आहे. 

लंडनच्या 'द टाइम' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी म्हटलं होतं की, "लस वाटपावरुन आपल्याला देशातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींकडून धोका आहे." "सत्य बोलल्यास आपला शिरच्छेद केला जाईल," अशी भीतीही पुनावाला यांनी व्यक्त केली होती. यानंतर केंद्र सरकारने अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. 

यानंतर पत्रकार राहुल कंवल यांनी खळबळजनक आरोप करत म्हटलं होतं की, "अदर पुनावाला यांनी मला व्हिडीओ पाठवले आहेत, ज्यात शिवसेनेचे गुंडे त्यांच्या फॅक्टरीबाहेर उभे राहून धमकी देत होते आणि लसीची मागणी करत होते."

राहुल कंवल यांच्या दाव्यांनंतर शिवसेनेने 'इंडिया टुडे'चे संस्थापक अरुण पुरी यांना पत्र लिहून संबंधित अँकरवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामध्ये लिहिलं की,  "तुमच्या वृत्तवाहिनीतील ज्येष्ठ निवेदकाने केलेल्या बनावट बातम्यांविषयी मी तुम्हाला लिहित आहे. राहुल कंवल यांनी आजच्या शोमध्ये लसीसाठी 'सेनेचे गुंड' अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचा दावा केला होता. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि बदनामीकारक आहे."

कंवल यांच्या आरोपाचा संदर्भ देताना शिवसेनेने म्हटलं आहे की, "दरम्यान, दुसर्‍या पक्षाच्या अध्यक्षाचा व्हिडीओ शिवसेनेशी जोडून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे आमची बदनामी करणं यावरुन अँकरचा राजकीय पक्षपातीपणा स्पष्ट दिसतो. निवडणुकीच्या निकालाचा महत्त्वाचा दिवस आणि कोविड-19 महामारीबाबत देशभरात सुरु असलेल्या चर्चेपासून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक बदनामीकारक आणि खोटी माहिती पसरवण्याची मोहीम सुरु आहे."

यापूर्वी आपल्याच चॅनलमधील आणखी एका वृत्तनिवेदिकेने आमच्या पक्षाच्या नेत्यावर कशाप्रकारची टिप्पणी केली होती, याची आठवणही अरुण पुरी यांना या पत्रातून करुन दिली. आदित्य ठाकरे यांना 'शिवसेनेचा पप्पू' म्हणत असल्याचा अंजना ओम कश्यप यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याचाच हा संदर्भ असल्याचं समजतं. 


खोट्या आणि बदनामीकारक दाव्याप्रकरणी राहुल कंवल यांच्यावर कारवाई करावी, शिवसेनेची मागणी

पत्रकारितेचे मूल्य राखत यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करतो, असं शिवसेनेने पत्रात म्हटलं. तसंच राहुल कंवल यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. "ज्या शोमधून त्यांनी चुकीची बातमी दिली होती, त्या शोमध्येच त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची अपेक्षा आहे," असं शिवसेनेने म्हटलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Navi Mumbai : नवी मुंबई शहरात कोणते प्रश्न प्रलंबित? नागरिकांच्या नेमक्या समस्या काय?
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले
Anjali Damania on Ajit Pawar : येवलेंचा अटकपूर्व जामीन कोर्टात जाऊन पोलिसांनी रद्द करुन आणावा
Rajan Patil on Ajit Pawar : अजित पवार आणि शरद पवारांचा आमच्या प्रगतीत मोठा वाटा,राजन पाटील म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
Rahul Gandhi: 'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
'तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय' 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अन् अजित पवारांची खलबतं मुंबईत
Kagal Nagar Palika Election: थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सूनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार; हसन मुश्रीफांची कागलला 'समझोता' एक्स्प्रेस सुसाट!
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली?  मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे 'ते' शब्द मनात रुतले, अन्...
Embed widget