एक्स्प्लोर

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय

केंद्र सरकारने 9 वी ते 12 पर्यंतचे वर्ग 21 सप्टेंबरपासून करण्याची मुभा दिली असली तरी, महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.

मुंबई : राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिलाय. म्हणून आता दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबत एसओपी (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडलीय. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी केली. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी

21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे अवघड ग्रामीण भागामध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्यास पालकही संमती देणार नाहीत. निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरु करु नये. मागील वर्षी आलेले वेतनेत्तर अनुदान परत गेलंय. हे अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावे, अशी मागणी बैठकीमध्ये केली आहे. संस्थाचालक महामंडळाच्या मागणीची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेऊन 21 सप्टेंबरपासून कोणतीही शाळा सुरु होणार नाही, असे आता स्पष्ट केलं आहे.

शाळेच्या शुल्काबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय झाला आहे. आता शासनाने तसे लेखी निर्देश देणे गरजेचे आहे. विनाअनुदानित शाळांची फी भरण्याबाबत शासनाने निर्देश द्यावे, अशी मागणी या बैठकीमध्ये संस्था चालकांनी केलीय. केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया अर्थात एसओपी जारी केली होती. याअंतर्गत केवळ इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थीच्या शाळा सुरु होणार होत्या तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये. म्हणून सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षण मंत्र्यांचा निर्णय

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Aaditya Thackeray : अशोक खरात प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची मागणी, आदित्य ठाकरेंची मागणी
अशोक खरात प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची मागणी, आदित्य ठाकरेंची मागणी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली, नेमकं काय घडलं?
ट्रम्प म्हणाले 5 दिवस ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून खिल्ली, इराणच्या मीडियात काय चर्चा?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Embed widget