एक्स्प्लोर

कोरोना काळात लोककलावंतांवर उपासमारीची वेळ, सरकारने मागण्यांकडे अन्यथा आंदोलनाचा इशारा

कलावंतांची राज्य सरकारने दखल घ्यावी आणि त्यांना योग्य ती मदत व सहकार्य करावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

मुंबई : संपूर्ण राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील बहुतांश उद्योग धंदे बंद पडलेत. तर लाखो लोकांचे रोजगार गेलेत. यामध्ये लोककलावंतांवर देखील उपासमारीची पाळी आली. अशावेळी सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी बुधवारी 16 सप्टेंबर रोजी शिवाजी पार्क चैत्यभूमी या ठिकाणी फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशन यांच्या वतीने कलावंतांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दोन हजाराहून अधिक विविध क्षेत्रातील कलाकार सहभागी झाले होते.

राज्यातील वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोकशाहीर तमाशा कलावंत, नाट्यकलावंत, कीर्तनकार, भारूडकार, भजनी मंडळ, साहित्यिक, लेखक, गीतकार, कवी, शायर, हिंदी-मराठी-गुजराती-पंजाबी-तेलुगू-तमिळ-कन्नड आणि इतर भाषेत पार्श्वगायक, लोकगीत गायक, कव्वाल इत्यादी तंत्रज्ञान - निर्मात्यांच्या विविध संघटनांना एकत्रित करून फेडरेशन पार्टी स्थापन करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे प्रचंड आपत्कालीन परिस्थितीमधून जात असल्यामुळे या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु, गेल्या पाच महिन्यांपासून या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर कलावंतांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या कलावंतांची राज्य सरकारने दखल घ्यावी आणि त्यांना योग्य ती मदत व सहकार्य करावे, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणली. सार्वजनिक ठिकाणी आणि बंदिस्त सभागृहांमध्ये हे कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे या कार्यक्रमांवर रोजीरोटी कमावणाऱ्या हजारो कलाकारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. कले व्यतिरिक्त इतर कुठलाही व्यवसाय नसल्यामुळे कलाकार तंत्रज्ञांचे जगणे मुश्कील झालं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते काटकसरीनं आपला संसार चालवत होते. मात्र त्यांच्याजवळ असलेली रक्कम आता पूर्ण संपल्यामुळे इथून पुढं कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. राज्य सरकारने या कलाकारांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या कलाकारांनी केलेली आहे. राज्य सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली नाही, तर राज्यभरातील हजारो कलाकार पुन्हा एकत्र येऊन मोठं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या मोर्चाच्या दरम्यान देण्यात आलेला आहे.

कोरोना काळात अनेकांचे उद्योग धंदे बंद पडलेत. यामधून कलाकारही वाचलेले नाहीत. राज्यातील कलाकारांनी या राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करत गेली सहा महिने ते घरात बसून आहेत . कलाकार आपल्या उपजीविकेसाठी कले व्यतिरिक्त इतर कुठलाही व्यवसाय करत नाहीत. राज्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कलाकारांना बोलून त्यांच्या कार्यक्रमाची शोभाही वाढवत असतात. आता याच कलाकारांना समोर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कलाकारांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन त्यांना मदत करणं तितकंच गरजेचं आहे, असं अभिनेते विजय पाटकर यांनी म्हटलं.

कलेचे आणि कलाकारांचे अनेक प्रकार आहेत. तसेच कलाकारांच्या पाठीमागे बॅकस्टेज आर्टिस्ट देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. राज्यातील लाखो कलाकार केवळ कलेवर जगत आहेत. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक खालावत चाललेली आहे. या संदर्भात अनेक वेळा राज्य सरकारकडे निवेदन सादर करून कलाकारांची परिस्थिती आम्ही दाखवून दिलेली आहे. हॉटेल , कार्यालय ज्या पद्धतीने सुरू झालीत त्याच पद्धतीने आता आम्हा कलाकारांना कला सादर करण्यासाठी आमच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही वारंवार करीत आहोत. मात्र राज्य सरकार त्याकडे एक गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने आता कलाकारांना जगवण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी विनंती समन्वयक व संगीत कला अकादमीचे संस्थापक मनोज संसारे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget