एक्स्प्लोर

भांडुप परिमंडळात 28 हजार ग्राहकांची वीज तोडली, महावितरणकडून सक्त वसुली

भांडुप परिमंडळ क्षेत्रात महावितरणने 28 हजार पेक्षा जास्त ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर वीज बिल भरा अन्यथा तुमचे कनेक्शन निखिल तोडण्यात येईल.

मुंबई : एकीकडे वाढीव वीज बिलामुळे सामान्य माणूस कर्ज काढण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे महावितरणने ग्राहकाकडून सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. फक्त भांडुप परिमंडळ क्षेत्रात महावितरणने 28 हजार पेक्षा जास्त ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर वीज बिल भरा अन्यथा तुमचे कनेक्शन निखिल तोडण्यात येईल. हे केवळ एक उदाहरण झाले, महाराष्ट्रात असे लाखो ग्राहक आहेत ज्यांना अव्वाच्या सव्वा वीजबील सोपवण्यात आले आणि आता ते वीजबिल भरावे यासाठी सक्तीची वसुली केली जात आहे. गेल्या वर्ष भरात कोरोना संसर्गाची झुंजत असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला महावितरणने मोठा शॉक दिला. त्यानंतर अधिक खोटी आश्वासने दिली गेली विरोधकांनी आंदोलने केली मात्र महावितरण काही मागे हटले नाही. महावितरणाच्या केवळ भांडुप परीमंडळामध्ये शनिवार पासून आतापर्यंत तब्बल 28 हजार ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यात आलेली आहे.

भांडुप परिमंडळात मोठा परिसर 

भांडुप परिमंडळात मुंबईतील भांडुप, मुलुंड, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा इतका मोठा परिसर आहे. यात असलेल्या 5 लाख 69 हजार 215 ग्राहकांकडून 449 कोटी 29 लाख रुपये वीज बिलाचा स्वरूपात देणे बाकी आहे. महावितरने शनिवार पासून सुरू केलेल्या कारवाईनंतर 33 हजार ग्राहकांनी तब्बल 31 कोटी 69 लाख रुपयांची थकबाकी भरली आहे. शनिवारी कारवाई सुरू झाल्यापासून तब्बल 28 हजार 864 ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात आली आहे त्यांच्याकडून 23 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. तर गेल्या एक वर्षापासून एकदाही वीज बिल न भरलेले एक लाख 63 हजार ग्राहक आहेत, यांच्याकडे 175 कोटींपेक्षा जास्त रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

एबीपी माझाची बातमी पाहिल्यानंतर मुलुंडमध्ये मनसैनिकांनी ठाण्यामध्ये भाजपच्या आमदारांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. इतक्या जणांवर वीज तोडण्याची कारवाई केलीच कशी असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मात्र त्यांनादेखील अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तर देऊन परत धाडले.

विरोधकांनी आज पर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र त्याचा काहीही फरक राज्य सरकारवर पडला नाही. वाढीव वीज बिलासह प्रत्येक ग्राहकाला वीज बिल भरवच लागणार आहे. फक्त भांडुप परिमंडळात झालेली ही कारवाई तर शुल्लक आहे, अशी कारवाई महाराष्ट्रात प्रत्येक परिमंडळात होत आहे. ज्यामध्ये गरीब जनता पिळवटून निघत आहे. सरकारने निदान याचा तरी विचार करावा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asian Youth Games: मुंबईच्या श्रिया साटमची 'सिल्व्हर' कामगिरी, MMA मध्ये भारताला ऐतिहासिक पदक
MCA Elections: 'क्रिकेटमध्ये राजकारण नको', Sharad Pawar यांचे संकेत, Ajinkya Naik पुन्हा अध्यक्ष होणार?
ICC Rankings : 'हिटमॅन' Rohit Sharma आता जगात भारी, Sachin Tendulkar यांना मागे टाकत रचला विश्वविक्रम!
CWC25 Semi-Final: Laura Wolvaardt च्या अविश्वसनीय खेळीने रचला इतिहास, South Africa पहिल्यांदाच World Cup फायनलमध्ये!
Child Safety: वसईतील 'अमेय क्लब'च्या स्विमिंग पूलमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
Bacchu Kadu : आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
Embed widget