एक्स्प्लोर

भिवंडी मनपाचा हलगर्जीपणा, राजीव गांधी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

त्यावेळी जय कुमार कंपनीच्या इंजिनियर टीमने उड्डाणपुलाची पाहणी केली होती आणि ब्रीज वाहतुकीस चांगला असल्याचा अहवाल दिला होता.

भिवंडी : भिवंडी शहरातील  राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खालचा स्लॅब आज सकाळी कोसळला. भिवंडी बस स्थानकाच्या बाजूला सकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मनपा प्रशासनाचा हलगर्जी आणि बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 2003 ते 2006 या तीन वर्षांच्या काळात हा उड्डाणपूल बनवण्यात आला होता. सुरुवातीला 15 कोटी रुपये या उड्डाणपुलाच्या कामासाठी मंजूर झालं होतं. मात्र काम पूर्ण होईपर्यंत या उड्डाणपुलासाठी एकूण 22 कोटी रुपये खर्च करण्यात आले. जय कुमार अँड कंपनीने हा उड्डाणपूल बनवण्याचा ठेका घेतला होता. 2006 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होतं. या उड्डाणपुलाला  राजीव गांधी उड्डाणपूल असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर 2013 साली या उड्डाणपुलावर कडकड असा आवाज येत असल्याने तत्कालीन सिटी इंजिनियरने जय कुमार कंपनीला त्यासंदर्भात अर्ज केला असल्याची माहिती मिळते. त्यावेळी जय कुमार कंपनीच्या इंजिनियर टीमने उड्डाणपुलाची पाहणी केली होती आणि ब्रीज वाहतुकीस चांगला असल्याचा अहवाल दिला होता. तसंच उड्डाणपुलावर पाणी साचू देऊ नये अशा सूचनाही मनपा प्रशासनास केल्या होत्या , मात्र या सूचनांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उड्डाणपुलावर दरवर्षी पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पाहायला मिळतं. एबीपी माझाने वारंवार उड्डाणपुलाची दूरवस्था दाखवली होती. तरीही मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच उड्डाणपुलाला तडे गेले असून सद्यस्थितीत हा ब्रीज नादुरुस्त आहे. विशेष म्हणजे आधी उड्डाणपुलासाठी कोट्यवधी रुपये केले आहेत. त्यातच महापालिकेने उड्डाणपुलासाठी आणखी 50 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटकAndheri Subway Water Logging : अंधेरी सबवे पुन्हा तुंबला! पाच फूट पाणी भरल्यानं सबवे बंदCity 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 | टॉप 25 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Embed widget