एक्स्प्लोर

30 डिसेंबरनंतर काळे पैसेवाल्यांचं जगणं मुश्कील होईल : मोदी

मुंबई: देशातील भ्रष्टाचार आणि काळापैसा संपवण्यासाठी आम्ही 8 नोव्हेंबर रोजी एक मोठी लढाई सुरु केली आहे. या लढाईत देशातील सर्वसामान्य जनता सेनापती म्हणून सहभागी झाली आहे. आता ही लढाई जोपर्यंत आम्ही जिंकणार नाही, तोपर्यंत थांबणार नाही, असा एल्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेत केला. पंतप्रधान म्हणाले की, "मी गोव्यामधील कार्यक्रमात देशातील जनतेकडून 50 दिवस मागितले होते. या काळात देशातील जनतेने भरपूर त्रास सहन केला आहे. पण 50 दिवसांनंतर त्यांचा हा त्रास कमी होईल. जे अप्रामाणिकपणे पैसे कमावत आहेत, त्यांचं जगणं मुश्किल होईल. त्यांनी वेळीच सावध व्हावं. असा इशाराही दिला. पंतप्रधानांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करताना, शिवाजी महाराजांना वंदन केले. ते म्हणाले की, ''भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकीत पक्षाची धुरा माझ्याकडे दिली. त्यावेळी मी सर्वप्रथम रायगडावर येऊन, शिवरायांच्या समाधीला वंदन केलं.'' शिवरायांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी ''आजपर्यंत आपण इतिहासकार आणि चित्रकारांच्या नजरेतून शिवरायांचे जी प्रतिमा आपल्या मनात साकार केली, ती एक योद्धा म्हणून होती. पण शिवरायांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी संघटन कौशल्याचा जो आदर्श घालून दिला, तो सर्वांना सदैव प्रेरणादायी आहे. तसंच त्यांनी व्यवस्थापनाचे जे धडे दिले, ते आजच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगाचे आहेत. सागरी सीमांच्या रक्षणासंदर्भात त्यांनी नौदलासमोर आदर्श वस्तूपाठ जनतेला घालून दिला. किल्ल्याचे संवर्धन करण्यात असमर्थ ठरलोत राज्यातील गडकोट किल्ल्यांसदर्भातही बोलताना ते म्हणाले की, आजही पर्यटनाचा विषय येतो, तेव्हा ताजमहालचे सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पण देशातील अनेक राजे-महाराजांनी आपले राजवाडे, गडकोट किल्ल्याच्या माध्यमातून जो ठेवा आपल्याला दिला, त्याचे जतन करण्यात आपण असमर्थ ठरलो अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. पण पुरातत्व खात्याला सांगून यामधूनही काही मार्ग काढून देशातील सर्व गडकोट किल्लेही पर्यटन क्षेत्रे होतील काय याकडे लक्ष देऊ.असेही यावेळी म्हणाले. मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्याप्रमाणावर प्रकल्पाचा शुभारंभ मुंबईमध्ये आज शुभारंभ झालेल्या कामांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ''आज या मंचावरुन ज्या प्रकल्पाचा शुभारंभ होतोय, त्याची प्रकल्पांची किंमत एक लाख सहा हजार कोटी रुपये आहे. मुंबईत इतक्या मोठ्याप्रमाणात प्रकल्पाचा शुभारंभ होणारी मुंबईतली मोठी घटना असल्याचेही ते यावेळी म्हणाले. नगरपालिका निवडणुकीतील यशाबद्दल आभार यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला दिलेल्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ''नोटाबंदीच्या निर्णय घेतल्यापासून सव्वाशे कोटी देशवासीयांना त्रास सहन करावा लागला. पण एका क्षणासाठीही त्यांनी माझी साथ नाही सोडली. त्यांना अनेकांनी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला जराही न भिक घालता, त्यांनी देशाच्या भल्यासाठी साथ दिली. बँकवालेही फसणार हा निर्णय अयशस्वी होण्यासाठी अनेकांनी षडयंत्र रचली. यामध्ये बँकवाल्यांनाही सहभागी करुन घेतलं. पण त्यांचाही बळी दिला आणि तुम्हीही आडकलात. ज्या बँकवाल्यांनी अशा माणासांना साथ दिली तेही यातून सुटणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अप्रामाणिक लोकांनी लवकरच सावध व्हावे नोटाबंदीच्या निर्णयानंतर गोव्यातील सभेत जनतेकडून 50 दिवस मागितले होते. यावेळी प्रमाणिक लोकांना त्रास झाला. पण आता त्यांचा हा त्रास कमी होईल, आणि जे अप्रमाणिक आहेत, त्यांचा त्रास वाढेल. त्यामुळे अशा लोकांनी लवकरच सावध व्हावे. देशाच्या कायद्याला, नियमांना मान्य करुन कायद्याने वागा, आणि सुख समाधानानं जीवन जगा. हे सरकार तुम्हाला सुळावर चढवणार नाही. पण गरिबाच्या हिश्श्याचं त्यांना दिल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही. ३० वर्षानंतर हिदुस्तानातील जनतेने भ्रष्टाचार संपवण्याचं सरकार निवडून दिलं आणि सरकार हे करेल. कळ्या पैशांच्या विरोधातील लढ्यात सव्वाशे कोटी जनता सेनापती म्हणून लढायला निघाली आहे, आणि ही लढाई जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत थांबणार नाही. असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं, नेमकं काय घडलं?
निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं अन्... VIDEO
Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?
मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, काय घडलं?

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं, नेमकं काय घडलं?
निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं अन्... VIDEO
Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?
मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, काय घडलं?
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
Embed widget