एक्स्प्लोर

ओबीसी मूळ एसईबीसीच : छगन भुजबळ

सध्याच्या आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश होणार नाही. मराठा समाजाला त्याच्या बाहेरच आरक्षण दिलं जाईल. अहवालातही स्वतंत्र आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई : "राज्यघटनेत ओबीसी हा शब्द नाही, त्याच एसईबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हाच शब्द आहे. त्यामुळे मराठा समाजाला जर एसईबीसीतून आरक्षण दिलं, ते टिकणार नाही. त्यासाठी संसदेत जाऊन कायदा करा," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांनी आज बाजू मांडली. "राज्यघटनेत ओबीसी हा शब्द नाही, त्याच एसईबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हाच शब्द आहे. आपण सोयीस्कर म्हणून ओबीसी म्हणतोय. एससी, एसटी, ओबीसी धरुन जेव्हा हलबा-कोष्टी गोवारींचा प्रश्न आला तेव्हा त्यांना 2 टक्के आरक्षण देऊन एकूण 52 टक्के आरक्षण ठरलं. पण हायकोर्टाने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नसल्याचं सांगितलं. मग 50 टक्क्यांमधील इतर प्रवर्गांचं आरक्षण बाजूला करुन ओबीसींचं 19 टक्के आरक्षण राहिलं. त्यातलं दोन टक्के आरक्षण हलबा-कोष्टी, गोवारींना गेलं. म्हणजे ओबीसींमधील 350 जातींना 17 टक्के राहिलं. पण 50 टक्क्यांच्या मर्यादेमुळे मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसींच्या 17 टक्क्यांमध्येच येणार. राज्यात आणि केंद्रात तुमचंच सरकार आहे. संसदेत हा मुद्दा घेतला तर कोणीही विरोध करणार नाही. 50 टक्क्यांची मर्यादा हटवली तर महाराष्ट्रातील मराठा, जाट, पाटिदार या सगळ्यांचे प्रश्न सुटतील. ही मर्याद घटनेत नाही, ती सुप्रीम कोर्टाने घालून दिली आहे. त्यावर संसद निर्णय घेऊ शकतं," असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सध्याच्या आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश होणार नाही. मराठा समाजाला त्याच्या बाहेरच आरक्षण दिलं जाईल. अहवालातही स्वतंत्र आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये किंवा 52 टक्के आरक्षण ज्यांना मिळालं आहे, त्यात वाटेकरी करण्याचा प्रश्नच नाही." कायद्यानुसार शिफारशी स्वीकारल्या जातात, अहवाल नाही : मुख्यमंत्री यावरुन गोंधळ झाल्याने मुख्यमंत्री आज विधानसभेत निवदेन दिलं. ते म्हणाले की, "अहवालातील सर्व शिफारशी स्वीकारल्या, असं सरकारने हायकोर्टात सांगितलं आहे. मात्र अहवाल स्वीकारला नाही, असं वृत्त समोर आलं आहे. मात्र कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर जो कायदा  तयार केला आहे त्यात केवळ शिफारशी स्वीकारल्या जाऊ शकतात. कायद्याप्रमाणे शिफारशींवर निर्णय घ्यावा लागतो. पुढे गोंधळ नको म्हणून अहवालातील शिफारशी स्वीकारल्या, पूर्ण अहवाल नाही असं राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितलं." मराठा समाजामध्ये संभ्रमावस्था : अजित पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री म्हणतात जल्लोष करा, पण जल्लोष करण्याआधी नक्की काय झालंय, कसं झालंय तो अहवाल सगळ्यांसमोर ठेवा. सरकारने मराठा आरक्षणाचा अहवाल स्वीकारला नाही, शिफारशी स्वीकारल्या अशी माहिती समोर येत आहे. आम्ही पण सत्तेत होतो, कुठलाही अहवाल आल्यावर त्यात काय आहे हे समोर मांडलं जातं. सरकारमधील काही महत्त्वाचे लोक वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात. त्यामुळे मराठा समाजात संभ्रमावस्था, अस्वस्थता आहे. ती अस्वस्थतता दूर करण्याचं काम राज्याचा प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे. चंद्रकांत दादांनी आरक्षण कोर्टात टिकावं असं साकडं पांडुरंगाला घातलं, पण साकडं कशासाठी घातलंय ते लोकांना कळू द्या. धनगरांच्या अहवालाचं काय झालं हे कळत नाही. पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण देतो, असं मुख्यमंत्र्यांनी बारामतीमधील माझ्या मतदारसंघात बोलले होते, पण त्यांनी ते दिलं नाही."

महत्त्वाच्या बातम्या

VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget