एक्स्प्लोर

'पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याकडे लक्ष; ट्रान्सपोर्टचा मिनिस्टर असल्याने हातात दांडा घेवून बसलोय' : नितीन गडकरी

येणाऱ्या काळात समाजाला सुखी समृध्दी करायचं असेल तर समाजाला ध्वनी प्रदूषण ,जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक बोलण्यासाठी चर्चेत असतात. कल्याणमध्ये बोलताना गडकरी यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे. गडकरी यांनी म्हटलं की,  दिल्लीमध्ये गेल्यावर दोन दिवसात तब्येत बिघडते. आता मी ट्रान्सपोर्टचा मिनिस्टर असल्याने हातात दांडा घेवून बसलोय. पेट्रोल डिझेलचा वापर कसा कमी होईल याकडे लक्ष देतोय. तुम्ही वाहनांना लोन देता मात्र जर शक्य झालं तर ग्रीन फ्युल किंवा इलेक्ट्रिक वाहनावरील कर्जावरील व्याजदरात थोडी सवलत द्या अशी विनंती बँकेला केली .चार वर्षात पेट्रोल डिझेलचा वापर कमी होईल असा विश्वास आहे, असं गडकरी म्हणाले. 

गडकरी म्हणाले की, येणाऱ्या काळात समाजाला सुखी समृध्दी करायचं असेल तर समाजाला ध्वनी प्रदूषण ,जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे असं आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी  केलं. दी कल्याण जनता सहकारी बँक 50 व्या वर्षात पदार्पण करत असून बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ उपस्थित होते . 

... तर सगळी जनता एसी बसमध्ये फिरू शकते 

पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटलं की, दिल्लीत माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे. 100 टक्के इथोनोल वर चालणारी गाडी आहे मी या गाडीमधून मुख्यमंत्र्यांना फिरवतो. त्यांना सांगतो तुमच्या राज्यातील पेट्रोल डिझेल बंद करा. मुंबई चालणारी एक इलेक्ट्रिकची बस नॉन एसी 39 रुपये किलोमीटर, एसी 41  रुपये पर किलोमीटर आणि बेस्टची डिझेल बस 115  रुपये पर किलोमीटर. त्यामुळे मुंबई ठाणे कल्याण मध्ये फिरणाऱ्या सर्व बस इलेक्ट्रिक झाल्या तर 30  तक्के भाडे कपात करून सगळी जनता एसी बसमध्ये फिरू शकते असे सांगितले.

मी बजेटवर अवलंबून नाही, मी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे करतो

गडकरी म्हणाले की, 1995 साली मंत्री असताना त्यावेळेस तेराशे कोटीचं बजेट होतं. ठाणे भिवंडी बायपास हा पहिला रस्ता बीओटीवर केला होता. तेव्हा मला प्रश्न विचारला होता की, रस्ते बीओटीवर काढता मग सरकार बीओटीवर का देत नाही. पण सरकारजवळ पैशांची कमी होती, त्यावेळेस पब्लिक बाँडमध्ये गेलो, हे सगळे रस्ते पूल केले व त्याचे पैसे वसूल झाले . तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता विकला आणि 8 हजार कोटी कमावले, मात्र हे पैसे राज्यातील विकास कामासाठी खर्च होणार आहे. वरळी बांद्रा या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मजबूरीही होती, बजेट कमी होते. मात्र मी बजेटवर अवलंबून नाही, मी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे करतो अशी माहिती देखील त्यांनी दिली. जो रिटायर,पेंशनर ,कॉन्स्टेबल आहे, जो नोकरी करतो त्याला 8 टक्के  रिटर्न द्यायचे आणि त्याच्या पैशातून हाय वे बांधायचे असं देखील ते म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
RBI : आरबीआयचा नियम मोडणाऱ्या 2 फायनान्स कंपन्यांना दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला
RBI : आरबीआयचा नियम मोडणाऱ्या 2 फायनान्स कंपन्यांना दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला
IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहलीच्या भविष्याचा निर्णय होणार, निवड समितीची बैठक काही तासांवर; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक  
रोहित अन् विराट लवकरच पुन्हा मैदानावर?ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात कुणाला स्थान? निवड समितीची बैठक काही तासांवर   
Asia Cup ची ट्रॉफी पळवणाऱ्या मोहसीन नक्वीला विशेष गोल्ड मेडल मिळणार, पीसीबीच्या अध्यक्षाला पुरस्कार जाहीर करताना भलतंच लॉजिक लावलं
भारताची Asia Cup ची ट्रॉफी पळवणाऱ्या मोहसीन नक्वीला विशेष गोल्ड मेडल मिळणार, पाकचं भलतचं लॉजिक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
RBI : आरबीआयचा नियम मोडणाऱ्या 2 फायनान्स कंपन्यांना दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला
RBI : आरबीआयचा नियम मोडणाऱ्या 2 फायनान्स कंपन्यांना दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला
IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहलीच्या भविष्याचा निर्णय होणार, निवड समितीची बैठक काही तासांवर; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक  
रोहित अन् विराट लवकरच पुन्हा मैदानावर?ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात कुणाला स्थान? निवड समितीची बैठक काही तासांवर   
Asia Cup ची ट्रॉफी पळवणाऱ्या मोहसीन नक्वीला विशेष गोल्ड मेडल मिळणार, पीसीबीच्या अध्यक्षाला पुरस्कार जाहीर करताना भलतंच लॉजिक लावलं
भारताची Asia Cup ची ट्रॉफी पळवणाऱ्या मोहसीन नक्वीला विशेष गोल्ड मेडल मिळणार, पाकचं भलतचं लॉजिक
Ladki Bahin Yojana : सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, E-KYC च्या OTP ची अडचण दूर करणार, आदिती तटकरेंची लाडक्या बहिणींसाठी पोस्ट
लाडक्या बहिणींना E-KYC करताना समस्या, आदिती तटकरेंनी दखल घेतली, पोस्ट करत म्हणाल्या,सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते....
Mumbai Metro : तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली मेट्रो पुन्हा सुरू, अंधेरी ते दहिसर मार्ग पुन्हा सुरू
तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली मेट्रो पुन्हा सुरू, अंधेरी ते दहिसर मार्ग पुन्हा सुरू
BMC : मुंबई महापालिकेत निवडणुकीपूर्वी खांदेपालट, चार नवे सहायक आयुक्त दाखल, 5 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
मुंबई महापालिकेत खांदेपालट, चार नवे सहायक आयुक्त दाखल, 5 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Embed widget