एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

नीरव मोदीचा अलिबागमधील बेकायदेशीर बंगला 2011 मध्येच नियमित

मुळात एसडीओंनी जी गोष्ट करणं अपेक्षित होती, ती जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलीच कशी? त्यांना हा अधिकार दिला कोणी? असा संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणी आता महसूल खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पीएनबी प्रकरणातील फरार मुख्य आरोपी नीरव मोदी याचा बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेला बंगला 2011 मध्येच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित केला होता, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. या सगळ्या प्रकाराबद्दल हायकोर्टाने तीव्र संताप व्यक्त केला. मुळात एसडीओंनी जी गोष्ट करणं अपेक्षित होती, ती जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलीच कशी? त्यांना हा अधिकार दिला कोणी? असा संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणी आता महसूल खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्याचे संकेत दिले आहेत. 2011 मध्ये बांधकाम नियमित केलं असेल तर मग आत्ता या वर्षी पुन्हा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे याबद्दल तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलंच का? असा सवालही हायकोर्टाने विचारला. तसेच “खरंतर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहा असं सांगावं वाटत नाही, पण या प्रकरणात जे काही झालंय त्याला काही अर्थच नाही" अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारून काढलं आहे. सुरेंद्र ढवळे यांनी अलिबागमधील समुद्र किनारी भरती आणि ओहोटीच्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरूय. ही सगळी बांधकामं महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीचे नियम आणि राज्य सरकारचे जमिनविषयक असलेल्या कायद्यांचं उल्लंघन करुन करण्यात आली आहेत, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. अलिबागमधे सीआरझेडचं उल्लंघन करुन 175 ठिकाणी असे बंगले बांधण्यात आले असल्याचं याचिकेत म्हणण्यात आलंय. यात नीरव मोदीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिजसह उद्योगपती आणि वरिष्ठ वकील यांच्या मालकीचे बहुतांश बंगले आहेत, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. शेतीसाठी असलेली जमीन विकत घेऊन त्यावर हे बंगले बांधण्यात आले. नीरव मोदीला 390 चौरस मीटर भागात बांधकाम करण्याची परवानगी असताना त्याने 1000 चौरस मीटरपेक्षा अधिक भागात बांधकाम केलं असल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं. या आणि अशा सगळ्या अनधिकृत बांधकामांकडे सोयीस्कर कानाडोळा करण्यात आला असल्याचं याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. संबंधित बातमी :

नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला आणि कार सील

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
मुंबई पालिकेत 87 हजारापेक्षा अधिक जन्म - मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, अमित साटमांचे आयुक्तांना पत्र, सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख
मुंबई पालिकेत 87 हजारापेक्षा अधिक जन्म - मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, अमित साटमांचे आयुक्तांना पत्र, सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
West Bengal Results: ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil nadu Election Result 2026 Thalapathy Vijay: मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
Maharashtra Live blog updates: कोल्हापूर शहरात आजपासून होणार दररोज पाणीपुरवठा, ABP माझाच्या बातमीनंतर कोल्हापूर महापालिकेला उपरती
Maharashtra Live blog updates: कोल्हापूर शहरात आजपासून होणार दररोज पाणीपुरवठा, ABP माझाच्या बातमीनंतर कोल्हापूर महापालिकेला उपरती
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
Embed widget