एक्स्प्लोर

नीरव मोदीचा अलिबागमधील बेकायदेशीर बंगला 2011 मध्येच नियमित

मुळात एसडीओंनी जी गोष्ट करणं अपेक्षित होती, ती जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलीच कशी? त्यांना हा अधिकार दिला कोणी? असा संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणी आता महसूल खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पीएनबी प्रकरणातील फरार मुख्य आरोपी नीरव मोदी याचा बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेला बंगला 2011 मध्येच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित केला होता, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. या सगळ्या प्रकाराबद्दल हायकोर्टाने तीव्र संताप व्यक्त केला. मुळात एसडीओंनी जी गोष्ट करणं अपेक्षित होती, ती जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलीच कशी? त्यांना हा अधिकार दिला कोणी? असा संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणी आता महसूल खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्याचे संकेत दिले आहेत. 2011 मध्ये बांधकाम नियमित केलं असेल तर मग आत्ता या वर्षी पुन्हा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे याबद्दल तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलंच का? असा सवालही हायकोर्टाने विचारला. तसेच “खरंतर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहा असं सांगावं वाटत नाही, पण या प्रकरणात जे काही झालंय त्याला काही अर्थच नाही" अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारून काढलं आहे. सुरेंद्र ढवळे यांनी अलिबागमधील समुद्र किनारी भरती आणि ओहोटीच्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरूय. ही सगळी बांधकामं महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीचे नियम आणि राज्य सरकारचे जमिनविषयक असलेल्या कायद्यांचं उल्लंघन करुन करण्यात आली आहेत, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. अलिबागमधे सीआरझेडचं उल्लंघन करुन 175 ठिकाणी असे बंगले बांधण्यात आले असल्याचं याचिकेत म्हणण्यात आलंय. यात नीरव मोदीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिजसह उद्योगपती आणि वरिष्ठ वकील यांच्या मालकीचे बहुतांश बंगले आहेत, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. शेतीसाठी असलेली जमीन विकत घेऊन त्यावर हे बंगले बांधण्यात आले. नीरव मोदीला 390 चौरस मीटर भागात बांधकाम करण्याची परवानगी असताना त्याने 1000 चौरस मीटरपेक्षा अधिक भागात बांधकाम केलं असल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं. या आणि अशा सगळ्या अनधिकृत बांधकामांकडे सोयीस्कर कानाडोळा करण्यात आला असल्याचं याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. संबंधित बातमी :

नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला आणि कार सील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget