एक्स्प्लोर

ठाण्यातील नवीन बांधलेल्या कोपरी ब्रिजला तडे, पुल वाहतुकीस धोकादायक, मनसेचा आरोप, IITमार्फत तपासणी सुरु

पूर्व द्रुतगती महामार्गाच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले असताना यापैकी एका मार्गिकेवर तडे गेले असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे. 

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गाच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले असताना यापैकी एका मार्गिकेवर तडे गेले असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे. 

ठाणे आणि मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक कोंडी मुक्त पूर्व द्रुतगती महामार्गाच्या स्वप्न शिवसेनेने गेली कित्येक वर्षे दाखवले आहे. त्यासाठी कोपरी येथे जुन्या रेल्वे पुलाचा जागी नवीन सहा मार्गिका असलेला ब्रिज उभारण्याचे दोन टप्प्यातले काम सुरू करण्यात आले. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या दोन मार्गिका नवीन बांधण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गे केवळ मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून त्याखाली जे ब्लॉक्स लावण्यात आलेली आहेत ते देखील तुटले असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. 

"या पुलाची वाट गेली अनेक वर्षे ठाणेकर बघत आहेत. जेव्हा हा पूल तयार झाला तेव्हाच हे तडे समोर आले आहेत. येणाऱ्या काळात जर अवजड वाहने यावरून गेली तर नक्कीच हा पुल कोसळेल, थुकपट्टी लावण्याचे काम इथे करण्यात आले असून, याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे", असे अविनाश जाधव यांनी सांगून पुलाच्या कामाचे ऑडिट आय आय टी मार्फत करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

यासंदर्भात आम्ही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि या नवीन पुलाची मागणी करणारे राजन विचारे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र राजन विचारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तर एकनाथ शिंदे यांनी फोनवरून यासंदर्भात आय आय टी तपासणी करत असल्याचे सांगितले. 

नवीन कोपरी ब्रिजचे स्वप्न दाखवून किमान दोन निवडणूक तरी शिवसेनेने लढवले असतील. तसेच आता या फुलाचे पहिल्या टप्प्यातील काम झाल्यानंतर देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे श्रेय शिवसेना घेईल. पण श्रेय घेण्याच्या नादात ब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे का? आणि येणाऱ्या काळात जर अपघात झाला तर त्याची जबाबदारी देखील शिवसेना घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Embed widget