एक्स्प्लोर

लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांनी देशभरात आर्थिक संकट उभं राहणार असल्याचं सांगत त्यासाठी एकत्रित चर्चेतून मार्ग काढला पाहिजे असं आवाहन यावेळी केलं.

मुंबई : लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, राज्यात मुंबई, पुणे, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद, पुणे येथे रुग्णसंख्या अधिक आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक व मालेगाव येथे संख्या अधिक आहे. मुंबई व पुण्यात संख्या अधिक असल्याची कारणे पाहिली तर दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या ठराविक ठिकाणी संख्या जास्त आहे. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असून टेस्टिंग वाढवली असल्याने संख्या वाढत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, 40 दिवसांपासून सगळं काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या, शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य शासनाच्या अर्थकारणावर या संकटाचा विपरीत परिणाम होणार आहे. अनेकांचे रोजगार बुडाले, कारखाने-उद्योग बंद झालेत. महाराष्ट्र सरकारचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प पाहिल्यास त्यात राज्याचे महसूल उत्पन्न हे 3 लक्ष 47 हजार कोटींच्या आसपास होते. पण आजची स्थिती पाहता या महसुलात तूट पडेल, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. ही महसुली तूट 1 लक्ष 40 हजार कोटी इतकी असेल. म्हणजे एकूण महसूलापैकी 40 टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम राज्याच्या इतर विकासकामांवर देखील होऊ शकतो. मी पंतप्रधानांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, असं आवाहनही यावेळी पवार यांनी केलं. या महिन्यात बँकांना नऊ दिवस सुट्टी असल्याने बँका बंद असतील म्हणून घाईने तेथे गर्दी करण्याची गरज नाही. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिस यंत्रणा, प्रशासन यंत्रणेवर हल्ले केल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यातून वेदना होतात. या यंत्रणांना आपण सहकार्य केलेच पाहिजे, असंही ते म्हणाले. 3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कोणीही रस्त्यांवर गर्दी करण्याची गरज नाही, पवार यांनी म्हटलं. 4 तारखेपासूनच्या नव्या गाइडलाइन्स सरकार लवकरच जाहीर करेल. त्यामुळे लॉकडाउन शिथिल केलं म्हणून लगेच सर्वांनी घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. शासन ज्या काही सुचना करेल त्या कटाक्षानं पाळल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले. जनतेनेही यात जबाबदारी घेण्याची गरज आहे. देशातील संस्था व घटकांनी आपल्या नफ्यातील काही भाग देऊन गरजू व्यक्तींना मदत करण्याची गरज आहे. सहकारी संस्था या संबंधीची भूमिका घेतील याची खात्री आहे. संकटग्रस्त लोकांना अधिक सहकार्य करण्याची गरज आहे, असंही पवार म्हणाले. लातूर भूकंपासारख्या घटनेचा विचार केला तर आपण आपत्ती निवारण कसे केले हे पाहण्यासाठी जागतिक बँक व अनेक लोक इथे भेटीसाठी आले होते. संकटावर धैर्याने मात करणे हा आपला इतिहास आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेतिहासाचे स्मरण करून आपण कामाला लागले पाहिजे. त्यात आपण यशस्वी होऊ ही मला खात्री आहे, असं देखील ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget