एक्स्प्लोर

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेस उद्यापासून सुरुवात

मुंबई विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस उद्यापासून ( 6मे पासून ) ऑनलाईन पद्धतीने सुरुवात  होत आहे. ही परीक्षा 21 मे पर्यंत चालणार आहे.  

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान  विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या परीक्षेस उद्यापासून ( 6मे पासून ) ऑनलाईन पद्धतीने सुरुवात  होत आहे. ही परीक्षा 21 मे पर्यंत चालणार आहे.  ही परीक्षा 450 पेक्षा जास्त महाविद्यालये घेत असून पदवीच्या अंतिम वर्षाचे दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हि परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सर्व महाविद्यालये सज्ज झाली आहेत.

मुंबई विद्यापीठाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या  शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे हिवाळी सत्राच्या अंतिम वर्ष सत्र 5 च्या परीक्षा डिसेंबर - जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जाहीर झाला. यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या परीक्षा मे 2021 मध्ये  घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार या परीक्षा होत आहेत. या परीक्षा महाविद्यालये स्वतंत्रपणे त्यांच्या वेळापत्रकानुसार 6 ते 21 मे 2021 दरम्यान घेणार आहेत.

अंतिम वर्षाच्या एकूण 45 परीक्षा होणार-
पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएस, बीएमएम, बीकॉम अकाउंट अँड फायनान्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासह मानव्य, वाणिज्य, विज्ञान व आंतरशाखीय विद्याशाखेच्या एकूण 45 परीक्षा उद्यापासून सुरु होत आहेत.

परीक्षेस अंतिम वर्षाचे 155155 विद्यार्थी

बीकॉम सत्र ६ या परीक्षेत सर्वाधिक म्हणजे  ६८,१०१, बीएमएसमध्ये १६,५०१, बीएमध्ये १४,५९२, बीएस्सी १०,७७०, बीकॉम अकाउंट अँड फायनान्समध्ये १०,२५१, बीएस्सी आयटीमध्ये ९७२० यासह बीएमएम, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स,बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज व इतर विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या ४५ परीक्षेमध्ये १ लाख ५५ हजार १५५ विद्यार्थी परीक्षेमध्ये बसत आहेत.

94 समूह व 450 महाविद्यालये सज्ज
परीक्षेच्या आयोजनासाठी विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या महाविद्यालयाचे  समूह  तयार केलेले  आहेत. प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयास लीड महाविद्यालय म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे. अशा 94 लीड महाविद्यालयावर हि जबाबदारी सोपवली आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या या परीक्षा मुंबई विद्यापीठातील 94 समूह ( Cluster ) महाविद्यालयाद्वारे  ४५० पेक्षा जास्त महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. १५ एप्रिल ते ५ मे २०२१ दरम्यान प्रथम व द्वितीय वर्षाच्या सत्र २ ते ४ या नियमित ( Fresh ) व सत्र १ व ३ च्या पुनर्परीक्षार्थी ( Backlog ) च्या परीक्षा यशस्वीरीत्या महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाल्या.

या उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ चार विद्याशाखेमधून ५०० पेक्षा जास्त परीक्षा घेत असून, त्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. या उन्हाळी सत्राच्या परीक्षेसाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 

व्हिडीओ

Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget