एक्स्प्लोर

Mumbai Train Accident Pushpak Express: सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Train Accident: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 6 जणांचा मृत्यू. सकाळी नऊ ते साडेनऊनच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला.

Mumbai Pushpak Express Accident: मध्य रेल्वेमार्गावर दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्थानकांदरम्यान एक्स्प्रेस गाडीतून रेल्वे ट्रॅकवर पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 8.25 वाजता लखनऊला जाणारी पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) सीएसएमटी स्थानकावरुन सुटली होती.  या एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशी दारात लटकत होते. ट्रेन मुंब्रा ते दिवा या स्थानकांदरम्यान असताना दारावर लटकलेले काही प्रवासी खाली ट्रॅकवर पडले. हे प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. यापैकी बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू  झाला आहे. (Mumbai Train Accident)

स्वप्नील निला यांच्या माहितीनुसार, सकाळी नऊ ते साडेनऊनच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. मात्र, दहा वाजल्यानंतरही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनाच हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती मिळाली नव्हती. केवळ कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतून प्रवासी पडले, एवढीच माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे होती. हे प्रवासी पुष्पक एक्स्प्रेसमधून पडले की लोकल ट्रेनमधून पडले, याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम होता. तसेच हा अपघात घडल्यानंतर या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून मुंब्रा स्थानकात आणण्यात आले. मात्र, त्याठिकाणी या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. अपघात होऊन जवळपास सव्वा तास उलटल्यानंतरही जखमी प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडून होते. त्यामुळे सहा प्रवाशांचा मृ्त्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा आणि कळवा परिसरात हा अपघात झाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध असल्याच्या रेल्वे प्रशासनाच्या दाव्याचे पितळ उघडे पडले आहे. यावर आता रेल्वे प्रशासन आणि सरकारकडून काय उत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, या अपघातामुळे मुंबईतील रेल्वे अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जवळपास दररोज गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होता. प्रवाशांनी वारंवार संताप व्यक्त करुनही रेल्वेच्या कारभारात फरक पडलेला नाही.

आणखी वाचा

मोठी बातमी: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Weather Updates: राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी सानप काय काय म्हणाले?, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Tukaram Mundhe In Vidhanbhavan Sting Energy Drink: स्टिंग एनर्जी ड्रिंकवरुन चर्चा, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एन्ट्री; नरहरी झिरवळांनी थेट आदेश देऊन टाकले!
स्टिंग एनर्जी ड्रिंकवरुन चर्चा, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एन्ट्री; नरहरी झिरवळांनी थेट आदेश देऊन टाकले!

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Embed widget