Monsoon Rain Mumbai: मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याकडून पावसाविषयी महत्त्वाची अपडेट
Monsoon Rain Mumbai: पावसाविषयी आनंदाची बातमी. मान्सून पुण्यात दाखल झाला असून लवकरच मुंबईत प्रवेश करेल, असे सांगितले जात आहे.

Monsoon Rain Mumbai: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती जारी केली आहे. त्यानुसार पुढील 48 तासांमध्ये मान्सून (Monsoon) मुंबईत प्रवेश करणार आहे. तर मान्सूनने पुण्यात प्रवेश केल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले आहे. हवामान खात्याकडून वातावरणातील बदलाचा एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार मान्सून रेषा अलिबाग, पुणे, निझामाबाद, दांतेवाडा, बलंगीर, सुंदरगड, गया आणि मुझफ्फरपूरपर्यंत पोहोचली आहे, अशी घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसासाठी बराच काळ ताटकळत बसलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत एरवी दरवर्षी 7 ते 8 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा 20 जून उलटला तरी मान्सून मुंबईत दाखल न झाल्याने परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळाली. रविवारी आणि सोमवारी सकाळी मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, सकाळी काही काळ रिमझिम सरी बरसल्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा दडी मारली. त्यामुळे वातावरणातील उकाडा अजूनही कायम आहे. (Maharashtra Rain news)
Monsoon Rain: राज्यात 24 जूनपासून पावसाचा जोर वाढणार
एल निनोचा प्रभाव, कोरडी हवा आणि कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव या सर्व घटकांच्या एकत्र येण्यामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 24 ते 28 जून या कालावधीत हवामान प्रणाली हळूहळू उत्तर किनारपट्टी आणि राज्यांच्या अंतर्गत भागांकडे सरकणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. गेल्या 15 दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत थोडाफार सक्रिय झाला आहे.
Mumbai Water: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68 % पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68 % पाणीसाठा, मुंबईची तहान भागवण्यासाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागणार. मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मालकीच्या अप्पर वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने राखीव साठ्याच्या वापरासाठी परवानगीही दिली आहे. आतापर्यंत हा साठा वापरावा लागला नव्हता. मात्र, आता अप्पर वैतरणा धरणातील पाणी साठा शून्यावर आल्यामुळे आता या साठ्याला हात घालावा लागणार आहे.
अप्पर वैतरणा वैतरणा - ० टक्के
मोडकसागर - २३.८० टक्के
तानसा- ३.०४ टक्के
मध्य वैतरणा- १०.३४ टक्के
भातसा- ७.९९ टक्के
विहार -४१.२५ टक्के
तुलसी- २२.०२ टक्के
एकूण -८.६८ टक्के
पाणीसाठ्याच्या नियोजनाकरिता पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुंबईत आधीच १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही १७ जून २०२६ पासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत. बांधकामे व जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्या खंडित करण्यात येणार आहेत. तसेच औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्ट्स क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल






















