एक्स्प्लोर

दाऊदसारख्या गँगस्टर्सना राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींचा आश्रय, पोलिसांनी राजकीय नियंत्रणातून बाहेर यावं: एम.एन. सिंह

Bombay After Ayodhya: बाबरी विध्वंसानंतर मुंबईत दंगली उसळल्या, आणि त्यानंतर मुंबईच्या जीवनावर काय परिणाम झाले यासंबंधी भाष्य 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' या पुस्तकात करण्यात आलं आहे. 

मुंबई: दाऊदसारखे गुंड मोठे होतात कारण त्यांना राजकारणी आणि समाजातील प्रभावशाली लोकांकडून आश्रय मिळतो, पोलिस दलातील राजकीय हस्तक्षेपामुळे काही अधिकारी भ्रष्ट बनतात असं वक्तव्य मुंबईचे माजी पोलिस आयुक्त एम.एम. सिंह यांनी केलं. एबीपी न्यूजचे पत्रकार जितेंद्र दीक्षित यांच्या 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' (Bombay After Ayodhya) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. राजकारणी आणि पोलिसांचे असलेले संबंध आणि अॅंटिलिया प्रकरणात डझनभर पोलिस अधिकारी तुरुंगात कसे गेले यावरही त्यांनी भाष्य केलं. एम. एन. सिंह हे पोलिस आयुक्त असताना त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डविरोधात मोर्चा उघडला होता, तसेच 1993 सालच्या बॉम्ब स्फोटप्रकरणी त्यांनी तपास केला होता. 

बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर मुंबईत कशा प्रकारे दंगली घडल्या, त्यावेळी परिस्थिती नेमकी कशी होती याचं वर्णय जितेंद्र दीक्षित यांनी त्यांच्या 'बॉम्बे आफ्टर अयोध्या' या पुस्तकात केलं आहे. या दंगलीचा मुंबईच्या राजकीय, सामाजिक जीवनावर, चित्रपट उद्योगावर, उद्योगविश्वावर आणि अंडरवर्ल्डवर काय परिणाम झाला याचंही वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे. हार्पलकॉलिन्स क्रॉनिकलने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

मुंबईतील तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करताना एम.एन. सिंह म्हणाले की, "दाऊद इब्राहिम राक्षस बनला कारण त्याला सामाजिक मान्यता मिळाली. समाजातील चांगल्या माणसांनी त्याच्याशी सलगी केली. अनेक बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट निर्मात्यांनी पगारावर गॅंगस्टर्स पोसले. राजकारणी गुन्हेगारांचा वापर करतात कारण त्यांना वाटते की गुन्हेगारांचा समाजावर वचक आहे, त्यामुळे त्यांना मते मिळू शकतात. यामध्ये पोलीस काय करू शकतात? गळ्यापर्यंत आल्यानंतरच राजकारण्यांना जाग येते. आता तर मी ऐकतो की राजकारणी गुंडांशी संगनमत करतात आणि त्यांच्यासाठी मालमत्ता खरेदी करतात."

एम.एन. सिंग यांनी एकेकाळी ज्या पोलिस दलाचं नेतृत्व केलं होतं त्याच दलातील काही अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवणे आणि एका व्यावसायिकाची हत्या केल्याप्रकरणी दोन एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिसांना अटक करण्यात आलेल्या कुप्रसिद्ध अँटिलिया प्रकरणाचा संदर्भ देत सिंग म्हणाले की, "मुंबई पोलिसांच्या इतिहासात यापेक्षा लज्जास्पद घटना घडलेली नाही. मुंबई पोलिसांचे ब्रीदवाक्य हे चांगल्याचे रक्षण आणि वाईटाला संपवायचे आहे. परंतु या प्रकरणात पोलिसांनी विरोधाभास दाखवला. एका निष्पापाचा बळी गेला. मी फक्त मुंबई पोलिसांच्या वतीने माफी मागू शकतो. राजकारण्यांचा सहभाग असताना अशा गोष्टी घडतात. त्यात सुधारणा करण्यासाठी पोलिसांना राजकीय नियंत्रणातून बाहेर काढले पाहिजे."

ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, दीक्षित यांच्या पुस्तकात गेल्या तीस वर्षांत मुंबईत घडलेल्या अनेक रंजक गोष्टींची माहिती मिळते. प्रमोद महाजन खून प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यापर्यंत जितेंद्र दीक्षित पोहोचू शकले. तपास पूर्ण होताच त्या तपास अधिकाऱ्याने राजीनामा दिला. प्रवीण महाजन यांनी त्यांच्या भावाला गोळ्या घातल्या, त्यावेळची नेमकी परिस्थिती या पुस्तकातून स्पष्ट होते." 

लॅबिरिंथ लिटररी एजन्सीचे संस्थापक अनिश चंडी म्हणाले की, एका रात्री डोंगरी, नागपाडा आणि मोहम्मद अली रोड सारख्या भागात फिरायला गेल्यानंतर हा विषय दीक्षित यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी तो सत्यात उतरवला. गेल्या काही दशकात या भागात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडतात. 

अभिनेता आणि माजी पत्रकार चारुल मलिक यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी मुंबई प्रेस क्लबमध्ये या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पत्रकार, पुस्तक प्रेमी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special ReportShivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget