एक्स्प्लोर

मुंबईतील हजारो कोळी बांधवांना बेघर करण्याचं भाजप सरकारचं षडयंत्र : कॉंग्रेसचा आरोप

निवडणूक संपताच इथल्या लोकांना हलवण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनीही इथे बीपीटीच्या कार्यक्रमात कुणालाही हलवलं जाणार नाही असं आश्वासन दिलं होतं, मात्र दुसर्‍या दिवशी बीपीटीमधील इमारतींना नोटीस दिल्या असल्याचे जगताप म्हणाले.

मुंबई : दक्षिण मुंबईतील हजारो कोळी बांधवांना बेघर करण्याचे केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला आहे. सुंदर नगर, आझाद नगर, गीता नगर गावठाणातील रहिवाशांना इथून हलवण्याचा डाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे कोळी बांधव या गावठाणावर राहात आहेत. नौदल विभागाला इथल्या झोपडपट्टीमुळे धोका असल्याची शंका निर्माण करून त्यांना इथून हलवण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोपही जगताप यांनी केला आहे. स्थानिक मच्छिमार, कोळी बांधव आणि त्यांच्या सोसायट्यांना विश्वासात न घेता या भागात बायोमेट्रिक नोंदणी सुरू असल्याचा आरोप देखील भाई जगताप यांनी केला आहे. निवडणुकीच्या आधी मात्र इथल्या नागरिकांची मतं घेण्यासाठी इथल्या घरांना हात लावू देणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणूक संपताच इथल्या लोकांना हलवण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनीही इथे बीपीटीच्या कार्यक्रमात कुणालाही हलवलं जाणार नाही असं आश्वासन दिलं होतं, मात्र दुसर्‍या दिवशी बीपीटीमधील इमारतींना नोटीस दिल्या असल्याचे जगताप म्हणाले. कुलाब्यामधील गीतानागर, सुंदर नगरी, आझाद नागरी हे नेवलच्या जमिनीत वसले आहे आणि त्यांच्या शिफ्टिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नेवल बेस हे नंतर आलं आहे, आधीपासूनच कोळी बांधव इथे राहत होते. मात्र आता या झोपडपट्टीमुळे नौदलाला धोका निर्माण होऊ शकतो अशी शंका निर्माण केली जातेय. हे भाजप शिवसेनेकडून केलं गेलंय असा आमचा आरोप आहे, असे भाई जगताप म्हणाले. महाराष्ट्र सरकार 2000 पर्यंतच्या सर्व झोपड्यांना संरक्षण देणार असं सांगत आहे, पण आता या नागरिकांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक संपताच नेवल प्रशासनासह सर्व प्रशासन जागे झाले आणि येथील नागरिकांच्या घराविषयी प्रश्न उपस्थित केला जातोय. सरकारने असं केलं तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असंही ते म्हणाले. या भागात मोठ्या इमारती आहेत त्यांना सरकार काही करत नाही, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget