एक्स्प्लोर

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना महामारीचे धडे मिळणार!

मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत साथीचे आजार आल्यावर त्याला सामोरे कसे जायचे याचं तंत्रशुद्ध, सखोल शिक्षण मिळणार आहे.भारतीय वैद्यकीय परिषदेने महामारीचे व्यवस्थापन हा विषय एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : गेली अनेक वर्षे या देशात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मात्र हे साथीचे आजार आल्यावर त्याला सामोरे कसे जायचे याचं तंत्रशुद्ध, सखोल असे शास्त्रीय शिक्षण आतापर्यंत एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. मात्र यापुढे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना महामारीचे धडे मिळणार आहेत. मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत पीपीई किटच्या वापरापासून, टेस्टिंग ते महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने असावे, तसेच फक्त या आजारांवर उपचार कसे द्यायचे, यापेक्षा सामाजिक, कायदेशीर आणि अशा आजाराचा हाहाकार झाल्यास कशा पद्धतीने हाताळायचा असा विद्यार्थी घडवण्यासाठी, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अर्थात भारतीय वैद्यकीय परिषदेने महामारीचे व्यवस्थापन हा विषय 'एमबीबीएस'च्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून यापुढे कोरोनासारखे संकट आल्यास हे विद्यार्थीही लढाई लढण्यास सक्षम असणार आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवणार नाही.

सध्याच्या परिस्थित वैद्यकीय क्षेत्रातील व्यवस्थेवर कोरोनाच्या उपचाराचा ताण आल्याचे सुरुवातीच्या काळात दिसत होते. कोरोनासारख्या संसर्गजन्य साथीच्या आजारात काय करावे हे पटकन कुणालाच सूचत नव्हते. कारण त्या पद्धतीचे सखोल वैद्यकीय ज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मिळतच नव्हते. केवळ साथरोग आणि औषधवैद्यक शास्त्र विभागातील तज्ज्ञ यांच्यावर खरी भिस्त होती. कालांतराने आपल्याकडे सर्वच पॅथीच्या तज्ज्ञ आणि इतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र यामध्ये खूप वेळ वाया गेला. शिवाय अशा आजाराची भीती डॉक्टरांमध्ये असल्याने तेही स्वतःला सुरक्षित मानत नव्हते. या सर्व गोष्टीवर रामबाण उपाय म्हणजे विद्यार्थी दशेतच त्यांना या सर्व गोष्टीचे ज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने हा सखोल अभ्यासक्रम बनवण्याचा निर्णय बोर्ड ऑफ गव्हर्नर्स-भारतीय वैद्यकीय परिषदेने घेतला. याकरता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या 12 तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम बनवला असून यापुढे तो 'एमबीबीएस'च्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे.

आपल्या देशात आतापर्यंत अनेक साथीचे आजार येऊन गेलेत त्यापैकी स्पॅनिश फ्लू, प्लेग, सार्स, स्वाईन फ्लू, निपा व्हायरस, माकड ताप, जपानी मेंदू ज्वर, बर्ड फ्लू हे आणि असे विविध आजार वर्षभरात विविध टप्प्यावर येत असतात.

याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की, "सध्याचा हा अभ्याक्रम काळाची गरज बघून बनवण्यात आला असून त्याचा 'एमबीबीएस'च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनासारख्या महामारीमध्ये 'एमबीबीएस' पदवी मिळवलेला विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने या आजाराचा सामना करु शकेल. त्याला या अभ्यासक्रमात महामारी आणि साथीचे आजार यामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीचे ज्ञान पदवीला असतानाच मिळणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यासाला गुण असल्यामुळे विद्यार्थ्यांना या सर्व बाबींचा अभ्यास करावाच लागणार आहे. त्याच्या साडेचार वर्षाच्या कालावधीत त्याला हा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे."

संसर्ग प्रादुर्भाव कसा रोखायचा, पीपीई किटचा वापर कसा करावा, टेस्टिंग कशा पद्धतीने करायचे त्यात चाचण्यांचे नमुने कसे घ्यावे, ते कशा पद्धतीने ठेवावे, आजाराचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, कशा पद्धतीची उपचारपद्धती असते ती कशी हाताळायची, साथीच्या आजाराचे व्यवस्थापन- त्यात विलगीकरण, अलगीकरण, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग कसे करावे, त्याची माहिती शास्त्रीय पद्धतीने कशी घ्यावी, मिळालेल्या डेटामधून संशोधन, चिकित्सालयीन चाचण्या, नैतिक शास्त्र, तसेच सवांद शास्त्र - टेलिमेडिसिनचा वापर या आणि अशा विविध गोष्टी ज्या महामारीच्या आरोग्य व्यवस्थपनात लागतात त्याचे सर्व ज्ञान यापुढे या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. प्रामुख्याने या अभ्यासक्रमात चिकित्सालयीन औषधशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जनऔषध वैद्यकशास्त्र, जीवरसायन शास्त्र, औषधवैद्यक शास्त्र, श्वसनविकार या विभागातील शिक्षक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबाबत शिकवणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget