![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुलांना वेठबिगार बनवलं जातंय, हे प्रगत महाराष्ट्राला शोभणारं नाही, दखल घ्या अन्यथा...; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : लहान मुलांना वेठबिगार बनवण्याच्या प्रकारांबाबत राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त. मुलांच्या वेठबिगारीचा प्रकार दिसल्यास तक्रार करा, राज यांचं आवाहन.
![मुलांना वेठबिगार बनवलं जातंय, हे प्रगत महाराष्ट्राला शोभणारं नाही, दखल घ्या अन्यथा...; राज ठाकरेंचा इशारा Maharashtra Navnirman sena Chief Raj Thackeray warning on child labor issue in maharashtra Marathi News मुलांना वेठबिगार बनवलं जातंय, हे प्रगत महाराष्ट्राला शोभणारं नाही, दखल घ्या अन्यथा...; राज ठाकरेंचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/f37f3d3004e61d304c785c0a1a6c51d0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raj Thackeray on Child Labor Issue : लहान मुलांच्या वेठबिगारीवरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पत्र ट्वीट केलं आहे. लहान मुलांकडून वेठबिगारीच्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. प्रगत महाराष्ट्राला हे शोभणारं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, मुलांच्या वेठबिगारीचा प्रकार दिसल्यास तक्रार करा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारनं तात्काळ या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणीही राज यांनी केली आहे. यावेळी जर गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक (Maharashtra Navnirman Sena) आपल्या पद्धतीनं धडाही शिकवतील, असा सूचक इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.
— Raj Thackeray (@RajThackeray) September 23, 2022
वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. pic.twitter.com/sMxyOy4dzS
राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हणालेत?
गेल्या काही दिवसांपासून,विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.
वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं…
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.
नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.
राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.
पण हे करताना एकूणच जागृन् समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील.
या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)