एक्स्प्लोर

Javed Akhtar Controversy: जावेद अख्तर यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी 

Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी RSS, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांचीही मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं म्हटलं होतं यावरुन त्यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक झाली आहे.

Javed Akhtar Controversy: प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानची प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत टीकेची झोड उडवली आहे. त्याचसोबत भारतातील आरएसएस (RSS), विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलचे समर्थन करणाऱ्यांचीही मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावरुन त्यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.  त्यांच्या जुहूमधील घरासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. शिवाय त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. आज दुपारी 12 वाजता घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यात जाऊन आमचा प्रखर विरोध दर्शवीत जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास महाराष्ट्र सरकारला भाग पाडणार असल्याचं राम कदम यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते जावेद अख्तर

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी आरएसएस आणि इतर संघटनांची तुलना तालिबानशी केल्याने आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. जावेद अख्तर म्हणाले की, "ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत."

भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतोय असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं. जावेद अख्तर म्हणाले की, "तालिबान आणि त्यांच्या सारखं वागायची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. देशातील काही मुस्लिमांनीही अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर त्याचं स्वागत केलं आहे. भारतातील मुस्लिम तरुण हे चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टीच्या मागे लागले आहे. पण मुस्लिमांचा एक लहानसा गट असा आहे की जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात."

भारतातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करु शकत नाहीत. म्हणूनच भारत आताही नाही आणि भविष्यातही कधी तालिबानी बनू शकणार नाही असा विश्वास जावेद अख्तर यांनी व्यक्त केला. 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी सोडणाऱ्या आनंद परांजपेंना उपाध्यक्ष करू नका, सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, विश्वसनीय सूत्रांची माहिती
राष्ट्रवादी सोडणाऱ्या आनंद परांजपेंना उपाध्यक्ष करू नका, सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, विश्वसनीय सूत्रांची माहिती
A2MM Indradhanu Festival : अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Pune Crime:
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
Embed widget