एक्स्प्लोर
Advertisement
आयटी रिटर्न भरण्यासाठी शेवटचा दिवस, IT return न भरल्यास काय होईल?
जर करदात्यांनी वेळेत आयकर भरला नाही, तर 5 हजार रुपये ते 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
मुंबई: आयकर विवरणपत्र अर्थात आयटी रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावर्षी वेळेत आयकर भरला नाही तर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी आयकर भरण्यास उशीर झाला तर दंडाची कोणतीही तरतूद नव्हती. यावर्षी आयकर कायद्यामध्ये 234 F हे कलम वाढवण्यात आलं आहे. यानुसार आज जर कर भरला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
खरंतर दरवर्षी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जलै असते आणि दरवर्षी तरीख वाढवली जाते. त्याप्रमाणे यंदाही केंद्र सरकारने आयकर दात्यांना एक महिन्याचा अवधी वाढवून दिला आहे.
जर करदात्यांनी वेळेत आयकर भरला नाही, तर 5 हजार रुपये ते 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
दंडाचे नियम काय आहेत?
- जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे आणि तुम्ही 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरलात, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
- 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यीं 31 ऑगस्टनंतर आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
- 5 लाख रुपयांहून जास्त उत्पन्न असलेल्यांनी 31 जुलै ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत आपलं आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
- 5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
टेलिव्हिजन
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion