एक्स्प्लोर

I.N.D.I.A. Meet : 'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील बैठकीत रणनिती ठरली, जागा वाटपावर कोणता निर्णय?

I.N.D.I.A. meet : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावरही चर्चा झाली.

मुंबई :  भाजप आणि एनडीएच्या विरोधात स्थापन झालेल्या विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची मुंबईतील बैठक पार पडली. मुंबईतील बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यासह महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील बैठकीत आघाडीने जागा वाटपावरही निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचे जागा वाटप राज्यनिहाय होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव मंजूर झाला.

'इंडिया' आघाडीच्या बैठकीत काय ठरलं?

मुंबईत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.  

- आम्ही 'इंडिया' आघाडीतील पक्ष, जेवढं शक्य होईल तेवढं, लोकसभा निवडणूक एकत्रपणे लढवतील. विविध राज्यातील जागा वाटपांच्या चर्चा तातडीने सुरू करण्यात याव्या. योग्य समन्वय, चर्चा करून करून जागा वाटप पूर्ण करावे. 

- इंडिया आघाडीतील सर्व पक्ष लोकांचे प्रश्न आणि त्यांच्याशी निगडीत महत्त्वाच्या मुद्यांवर देशातील विविध भागांमध्ये लवकरात लवकर जाहीर सभांचे आयोजन करावे. 

- इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विविध भाषांमध्ये 'जुडेगा भारत, जीतेगा INDIA' या घोषवाक्यावर आधारीत प्रचार, मोहीम सुरू करण्यात यावी. 

आज आघाडीकडून समन्वय समिती, प्रचार समिती, संशोधन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत सहभागी पक्षांचे प्रतिनिधी असणार आहेत. 

पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत असताना संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले नाही. कोरोना काळात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही. आताच संसदेचे विशेष अधिवेशन कसे बोलावले? असा सवाल करताना खरगे यांनी देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोप केला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सध्या जे केंद्रात आहेत त्यांचा पराभव होईल. त्यांनी मीडियाचा ताबा घेतला आहे. त्यांच्या फक्त बातम्या प्रसिद्ध होतात. ते पराभूत होताच, प्रेस देखील मुक्त होईल. मग तुम्हाला जे वाटेल ते लिहा. त्यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे, आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही तयार आहोत, वेळेपूर्वी निवडणुकाही होऊ शकतात.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इंडिया आघाडी मोदी सरकारच्या पतनास कारणीभूत ठरेल. त्यामुळे अनेक बड्या शक्ती इंडिया आघाडी मोडून काढण्यासाठी कारस्थान करत आहेत. आमच्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्यात भांडण नाही. आम्ही सर्व एकजूट आहोत, असेही केजरीवाल यांनी म्हटले. 

या व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्ष देशाच्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सांगितले. या एकजुटीमुळे भाजपचा पराभव निश्चित आहे. आता भाजपला विजय मिळणे अशक्य आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Embed widget