एक्स्प्लोर

मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घरच नाही, अन्यथा मलाही नोटीस आली असती : देवेंद्र फडणवीस

"राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड, ही योग्य पद्धत नाही," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली.

मुंबई : "मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घरच नाही. नाहीतर मलाही नोटीस आली असती," असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला. तसंच राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपने आज (11 जून) मुंबईतील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

काही महिन्यांपूर्वी अपक्ष आमदार रवी राणा तसंच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. मुंबईतील घरात परवानगीपेक्षा अतिरिक्त बांधकाम प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. रवी राणा आणि नारायण राणे यांना सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिप्पणी केली होती. त्यानंतरच ही नोटीस पाठवली होती. हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.   

राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस
"निवडणुकीच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी जोपर्यंत आहात तोपर्यंत राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड. मी नशिबवान आहे की माझं मुंबईत घरच नाही. नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच द्यावी लागेल. नाहीतर मलाही नोटीस आली असती. पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपूरचं घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला ठिकाणी नोटीस आली नाही. ही योग्य पद्धत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री आणि सरकारने अंतर्मुख व्हावं; फडणवीसांचा सल्ला
या पराभवानंतर आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने अंतर्मुख व्हायला हवं असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. राज्यातील विकास थांबला आहे. आमच्या काळातले सर्व प्रकल्प थांबवून राज्याचं अतोनात नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.  विमा कंपन्यांना मोठा फायदा होत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. किमान दोन कामे राज्य सरकारने दाखवावी असे आव्हानही फडणवीस यांनी दिले. 

आता विधान परिषदेवर लक्ष
फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्‌बुद्धि जागृत असेल असा दावा त्यांनी केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Embed widget