एक्स्प्लोर

लग्नातही घटस्फोट होतात, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीविरोधातील याचिकेवर तात्काळ सुनावणीस हायकोर्टाचा नकार

विधानसभा निवडणुकांनंतर राज्यामध्ये सत्तासंघर्षाचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकासआघाडी तयार करुन राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्री म्हणून स्वत: उद्धव ठाकरे शपथ ग्रहण करणार आहेत.

मुंबई : शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकादारांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या शपथविधीमध्ये काय बेकायदेशीर आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. 'कायदेशीर विवाहांमध्ये घटस्फोट होण्याची पद्धत नवी आहे का?' असा उपरोधिक टोला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने लगावला. त्यानंतर या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी वकिलांनी आणखी एका खंडपीठापुढे प्रयत्न केला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानेही यावर सुनावणीला स्पष्ट नकार दिला.

विधानसभा निवडणुकांनंतर राज्यामध्ये सत्तासंघर्षाचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकासआघाडी तयार करुन राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्री म्हणून स्वत: उद्धव ठाकरे शपथ ग्रहण करणार आहेत. मात्र निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेने युती करुन मतदारांना मत देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मतदारांनी त्यांना सर्वाधिक मताधिक्‍यांनी निवडूनही दिले आहे. मात्र आता भाजपशी वेगळे होऊन शिवसेनेनं विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी सूत जुळवत मुख्यमंत्रीपद स्वत:च्या पदरात पाडून घेतलं.

मात्र अशाप्रकारे मतदारांचा विश्‍वासघात करुन असं करता येऊ शकत नाही, त्यामुळे शिवसेना आणि भाजपनेच पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी एका याचिकेद्वारे यापूर्वीच केली गेली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी याचिकादार वकिल मॅथ्यू नेदुमपारा यांनी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे केला. मात्र यावर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत.

औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

औरंगाबादमधील पेशाने वकील असलेल्या रत्नाकर चौरे या व्यक्तीने शिवसेना नेते उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात पोलिसांत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असली तरी याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या प्रत्येक भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा असायचा. औरंगाबादच्या प्रचारात हाच महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र राज्याची सत्ता समीकरणं बदलली आणि शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले. हीच बाब औरंगाबादच्या एका मतदाराला पटलं नाही.

VIDEO | Oath Ceremony | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हा सर्वोच्च आनंद, एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget