एक्स्प्लोर

मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिकांतील धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामं थांबवा; हायकोर्टाचा आदेश

बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि सर्व पालिका आयुक्तांना दिला आहे. 

मुंबई: सर्वसामान्य लोकांना जगण्याच्या अधिकारासोबतच सुरक्षित घरात, इमारतीत राहण्याचाही अधिकार आहे, त्यामुळे मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिकांतील धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामं थांबवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि सर्व पालिका आयुक्तांना दिला आहे. धोकादायक इमारत कोसळण्याच्या दुघर्टना पूर्णपणे बंद होण्यासाठी मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांविरोधात दाखल केलेल्या सुओ मोटो याचिकेवर उच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला.

भिवंडीतील 'जिलानी' ही तीन मजली इमारत दोन वर्षांपूर्वी कोसळली होती. या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आपला राखून ठेवलेला निकाल शनिवारी जाहीर केला.

जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची सद्यस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. त्या इमारतीतील रहिवासी अनिश्चिततेच्या सावटाखाली सतत जीव धोक्यात घालून राहत असतात. मात्र, जगण्यासोबतच लोकांना सुरक्षित निवाऱ्याचाही मुलभूत अधिकार मिळालेला आहे हे विसरून चालणार नसल्याचंही हायकोर्टानं आपल्या निकालात नमूद केलं आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाला एक यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. या यंत्रणेनं धोकादायक इमारतींचं ऑडिट करून ज्या इमारती पाडणं गरजेचं आहे त्या तात्कश रिकाम्या काराव्यात, जेणेकरून जीवितहानी होणार नाही, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे. 

कोणतीही इमारत कोसळून वित्त अथवा जीवितहानी झाल्यास नगरविकास प्रधान सचिवांनी 15 दिवसांत त्याबाबतचा चौकशी अहवाल संबंधित विभागाकडून मागवावा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईची पावलं उचलावीत. इमारत कोसळून जीवितहानी झालेल्या कुटुंबातील पीडित हे नुकसानभरपाईसाठी पात्र असतील, असंही न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून उभारण्यात आलेली इमारत जर मोडकळीस असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत असेल तर अशा बांधकामांबाबत जागरुक नागरिकांनी ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असंही न्यायालयानं म्हटलेलं आहे.

सरकारी किंवा अन्य जमिनीवर अतिक्रमण करून वसलेली बेकायदेशीर वस्ती ही झोपडपट्टी म्हणून घोषित असते. तिथंही जर बेकायदा बांधकामे मोडकळीस आली असली तरी तिथं तोडकामाची कारवाई करण्याचा पालिकेला पूर्ण अधिकार आहे, असा निर्वाळाही न्यायालयानं दिला आहे. महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पालिकेनं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कठोरपणे लागू करण्याकडेही या निकालात हायकोर्टानं प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या घटकांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कायदा अधिक कडक करत तो कठोरपणे अंमलात आणणं आवश्यक आहे. कारण, अशा बेकायदेशीर इमारती उभ्या राहण्यामागे पालिका आणि सरकारी अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचं ब-याचदा समोर आलं आहे. 

कायद्याने अशा बांधकामांना वेळीच चाप लावून या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारून खटले दाखल करावेत. तरच भावी पिढ्यांसाठी आशेचा किरण दिसेल, अशी टिप्पणीही न्यायालयानं निकालाच्या शेवटी केली आहे. हायकोर्टाचे हे निर्देश मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, केडीएमएसी, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी निझामपूर या सर्व महापालिकांना लागू असतील.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Embed widget