एक्स्प्लोर

मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिकांतील धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामं थांबवा; हायकोर्टाचा आदेश

बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि सर्व पालिका आयुक्तांना दिला आहे. 

मुंबई: सर्वसामान्य लोकांना जगण्याच्या अधिकारासोबतच सुरक्षित घरात, इमारतीत राहण्याचाही अधिकार आहे, त्यामुळे मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिकांतील धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामं थांबवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि सर्व पालिका आयुक्तांना दिला आहे. धोकादायक इमारत कोसळण्याच्या दुघर्टना पूर्णपणे बंद होण्यासाठी मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांविरोधात दाखल केलेल्या सुओ मोटो याचिकेवर उच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला.

भिवंडीतील 'जिलानी' ही तीन मजली इमारत दोन वर्षांपूर्वी कोसळली होती. या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आपला राखून ठेवलेला निकाल शनिवारी जाहीर केला.

जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची सद्यस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. त्या इमारतीतील रहिवासी अनिश्चिततेच्या सावटाखाली सतत जीव धोक्यात घालून राहत असतात. मात्र, जगण्यासोबतच लोकांना सुरक्षित निवाऱ्याचाही मुलभूत अधिकार मिळालेला आहे हे विसरून चालणार नसल्याचंही हायकोर्टानं आपल्या निकालात नमूद केलं आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाला एक यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. या यंत्रणेनं धोकादायक इमारतींचं ऑडिट करून ज्या इमारती पाडणं गरजेचं आहे त्या तात्कश रिकाम्या काराव्यात, जेणेकरून जीवितहानी होणार नाही, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे. 

कोणतीही इमारत कोसळून वित्त अथवा जीवितहानी झाल्यास नगरविकास प्रधान सचिवांनी 15 दिवसांत त्याबाबतचा चौकशी अहवाल संबंधित विभागाकडून मागवावा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईची पावलं उचलावीत. इमारत कोसळून जीवितहानी झालेल्या कुटुंबातील पीडित हे नुकसानभरपाईसाठी पात्र असतील, असंही न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून उभारण्यात आलेली इमारत जर मोडकळीस असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत असेल तर अशा बांधकामांबाबत जागरुक नागरिकांनी ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असंही न्यायालयानं म्हटलेलं आहे.

सरकारी किंवा अन्य जमिनीवर अतिक्रमण करून वसलेली बेकायदेशीर वस्ती ही झोपडपट्टी म्हणून घोषित असते. तिथंही जर बेकायदा बांधकामे मोडकळीस आली असली तरी तिथं तोडकामाची कारवाई करण्याचा पालिकेला पूर्ण अधिकार आहे, असा निर्वाळाही न्यायालयानं दिला आहे. महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पालिकेनं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कठोरपणे लागू करण्याकडेही या निकालात हायकोर्टानं प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या घटकांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कायदा अधिक कडक करत तो कठोरपणे अंमलात आणणं आवश्यक आहे. कारण, अशा बेकायदेशीर इमारती उभ्या राहण्यामागे पालिका आणि सरकारी अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचं ब-याचदा समोर आलं आहे. 

कायद्याने अशा बांधकामांना वेळीच चाप लावून या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारून खटले दाखल करावेत. तरच भावी पिढ्यांसाठी आशेचा किरण दिसेल, अशी टिप्पणीही न्यायालयानं निकालाच्या शेवटी केली आहे. हायकोर्टाचे हे निर्देश मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, केडीएमएसी, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी निझामपूर या सर्व महापालिकांना लागू असतील.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget