एक्स्प्लोर

Mithibai college | मिठीबाई महाविद्यालयाच्या अजब कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे

परीक्षेला बसण्यासाठी 70 टक्के उपस्थिती अनिवार्य असतानाही 60 टक्क्यांपर्यंत उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्यास परवानगी दिल्याने मुंबई हायकोर्टाने महाविद्यालयाच्या अजब कारभारावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. एका विद्यार्थीथीने दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे नियम धाब्यावर बसून वर्षभरात निव्वळ 60 टक्के उपस्थिती राहिलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेला बसण्यास परवानगी दिलेल्या मिठीबाई महाविद्यालयाच्या अजब कारभारावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. यासंदर्भातील सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती, शिस्त आणि त्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्यांशी हा विषय निगडित असल्याने महाविद्यालय प्रशासने त्यासंबंधी आवश्यक ती पावलं उचलावित असे निर्देष देत या याचिकेची सुनावणी 29 जूनपर्यंत तहकूब केली.

मिठीबाई महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीची चौथ्या सत्रातील उपस्थिती 58.9 टक्के होती. त्यामुळे महाविद्यालयानं तिला परिक्षेला बसण्याची परवानगी नाकारली. तर दुसर्‍या एका विद्यार्थ्यांला मात्र 59 टक्के उपस्थित असतानाही परवानगी दिली. त्याविरोधात सदर विद्यार्थीनीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. मागील सुनावणीच्यावेळी महाविद्यालयानं विद्यार्थ्यांची 75 टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असेल त्यांना शैक्षणिक सत्रात पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल असे महाविद्यालयाचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर 60 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याची परवानगी दिल्याची नोटीस महाविद्यालयानं जारी केली. खंडपीठाने याबाबत प्राचार्य हांडे यांच्याकडे सविस्तर विचारणा केली असता हांडे यांनी 59.02 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवनागी देण्याचा निर्णय मॅनेजमेंटकडनं 6 मार्च रोजी घेण्यात आल्याचं स्पष्ट केले.

के.जे. सोमय्या रुग्णालयाला हायकोर्टाचा दणका, कोरोना रुग्णांकडून घेतलेले बिलाचे 10 लाख रूपये हायकोर्टात जमा करण्याचे निर्देश

सोमवारी 29 जूनपर्यंत याचिका तहकूब

यापूर्वी मिठीबाई महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्याच 107 विद्यार्थ्यांनी परिक्षेला बसण्यास परवानगी नाकारल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. तेव्हा महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार वार्षिक सरासरी उपस्थिती ही 75 टक्के आणि प्रत्येक विषयासाठी 70 टक्के उपस्थिती अनिर्वाय असल्याचं महाविद्यालयानं स्पष्ट केलं होतं. तेव्हा न्यायालयाने या विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा न देता याचिका फेटाळून लावली होती. याचिकाकर्त्यांनी लक्षात आणून दिलेली ही बाबही महाविद्यालयाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून न दिल्याने खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविद्यालय प्रशासनाचा हा प्रकार फार गंभीर आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतच्या नियमांचं कठोरतेने पालन करत नाही हे स्पष्ट होतयं. असं मत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करताना न्यायालयाने याप्रकरणी योग्य ती पावले उचलण्यासाठी महाविद्यालयाला अतिरिक्त वेळ देत सोमवारी 29 जूनपर्यंत ही याचिका तहकूब केली आहे.

Salon Reopens Tomorrow उद्यापासून राज्यात सलून सुरू होणार! साफसफाई करून ग्राहकांसाठी सलून स्टाफ तयार

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक, या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका लावावा, एकनाथ शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक, या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका लावावा, एकनाथ शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
Maharashtra Live Breaking News Updates: उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द
Maharashtra Live Breaking News Updates: उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द
Mumbai Crime News: मोहरमदरम्यान पेन किलर म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, एकाची प्रकृती गंभीर, 14 हजार गोळ्या जप्त
मोहरमदरम्यान पेन किलर म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या, एकाची प्रकृती गंभीर, 14 हजार गोळ्या जप्त

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
Embed widget