एक्स्प्लोर

... तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, शरद पवार, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांवर केली होती. त्या टीकाला उत्तर देताना पवार साहेबांनीही पक्ष बदलले मग त्यांचाही बाप काढणार का? असा प्रतिसवाल गणेश नाईकांनी आव्हाडांना विचारला आहे.

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.

एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार साहेबांची गणना देखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का? असा प्रतिप्रश्न गणेश नाईक यांनी केला आहे. त्या-त्या वेळेची गरज म्हणून पक्ष बदलले जातात, त्यामुळे अशी खालच्या स्थरावर टीका केली जाऊ नये, असंही गणेश नाईकांनी म्हटलं. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांचे जोरदार वाकयुद्ध सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, शरद पवार : जितेंद्र आव्हाड

माझा बाप काढला याचं मला दुःख नाही. कारण, माझा एकच बाप आहे. गणेश नाईक यांनी सतत बाप बदलले, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. गणेश नाईक यांनी 1990 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलल्याचं म्हटलं. अशी बाप बदलणाऱ्याची औलाद माझी नाही. माझा मरेपर्यंत एकच बाप आहे. जेव्हा गरीब आगरी समाजाची घरं पडत होती. त्यावेळी नाईक तुम्ही कुठं होता. ही घरं वाचवण्यासाठी सीमांकन का वाढवलं नाही?, स्वतःच बावखळेश्वर मंदिर वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. मग, गरीब आगरी समाजासाठी तुम्ही का लढले नाहीत, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. ज्या समाजावर तुम्ही मोठं झालात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? जे तुम्हाला मिळालं ते माझ्या बापामुळेच. कारण, शरद पवार माझा बाप आहे, असंही आव्हाड सांगायला ते विसरले नाहीत. गणेश नाईक यांनी आजपर्यंत फक्त पैशाच्या जीवावर राजकारण केलं. मात्र, मी निष्ठेच्या जीवावर राजकारण करतो. त्यामुळे नवीमुंबईची लढाई ही गद्दार विरुद्द निष्ठावंत अशी होणार असल्याचंही आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.

गणेश नाईक यांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट लिहीत गणेश नाईक, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला!, असं जाहीर आव्हान केलंय. "प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे." असल्याचं आव्हाड यांनी लिहलंय.

तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज.. : गणेश नाईकांचं जितेंद्र आव्हाडांना उत्तर

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणेतील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, "गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. नवी मुंबईतील कारखाने, दगड खाणींकडून ते खंडणी वसूल करत आहेत. भाजपने गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना नवी मुंबईतून उमेदवारी दिली होती. मात्र वडील गणेश नाईक यांनी राजकीय महत्वाकांक्षेसाठी मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा बळी घेतला. असा व्यक्ती कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला होता.

जितेंद्र आव्हाडांना टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी सिनेमाचा डॉयलॉग वापरला होता. ते म्हणाले होते की, "गणेश नाईकांचं नाव घेतलं तर आपलं भाषण ऐकतील असं काहींना वाटतं. ते भाषण ऐकण्यासाठी गणेश नाईकांचं नाव घेत आहेत. मी जो डायलॉग बोललो ती बाब खरी आहे. तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक". तसेच माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची केस दाखल नसून खंडणी मागितली नसल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं होतं.

Jitendra Awhad vs Ganesh Naik | आव्हाडांच्या 'खंडणीखोर' असल्याच्या टीकेला गणेश नाईकांचं उत्तर

गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, जितेंद्र आव्हाडांची टीका

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget