... तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर
बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, शरद पवार, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांवर केली होती. त्या टीकाला उत्तर देताना पवार साहेबांनीही पक्ष बदलले मग त्यांचाही बाप काढणार का? असा प्रतिसवाल गणेश नाईकांनी आव्हाडांना विचारला आहे.

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.
एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार साहेबांची गणना देखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का? असा प्रतिप्रश्न गणेश नाईक यांनी केला आहे. त्या-त्या वेळेची गरज म्हणून पक्ष बदलले जातात, त्यामुळे अशी खालच्या स्थरावर टीका केली जाऊ नये, असंही गणेश नाईकांनी म्हटलं. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांचे जोरदार वाकयुद्ध सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, शरद पवार : जितेंद्र आव्हाड
माझा बाप काढला याचं मला दुःख नाही. कारण, माझा एकच बाप आहे. गणेश नाईक यांनी सतत बाप बदलले, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. गणेश नाईक यांनी 1990 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलल्याचं म्हटलं. अशी बाप बदलणाऱ्याची औलाद माझी नाही. माझा मरेपर्यंत एकच बाप आहे. जेव्हा गरीब आगरी समाजाची घरं पडत होती. त्यावेळी नाईक तुम्ही कुठं होता. ही घरं वाचवण्यासाठी सीमांकन का वाढवलं नाही?, स्वतःच बावखळेश्वर मंदिर वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. मग, गरीब आगरी समाजासाठी तुम्ही का लढले नाहीत, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. ज्या समाजावर तुम्ही मोठं झालात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? जे तुम्हाला मिळालं ते माझ्या बापामुळेच. कारण, शरद पवार माझा बाप आहे, असंही आव्हाड सांगायला ते विसरले नाहीत. गणेश नाईक यांनी आजपर्यंत फक्त पैशाच्या जीवावर राजकारण केलं. मात्र, मी निष्ठेच्या जीवावर राजकारण करतो. त्यामुळे नवीमुंबईची लढाई ही गद्दार विरुद्द निष्ठावंत अशी होणार असल्याचंही आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.
गणेश नाईक यांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट लिहीत गणेश नाईक, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला!, असं जाहीर आव्हान केलंय. "प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे." असल्याचं आव्हाड यांनी लिहलंय.
तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज.. : गणेश नाईकांचं जितेंद्र आव्हाडांना उत्तर
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणेतील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, "गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. नवी मुंबईतील कारखाने, दगड खाणींकडून ते खंडणी वसूल करत आहेत. भाजपने गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना नवी मुंबईतून उमेदवारी दिली होती. मात्र वडील गणेश नाईक यांनी राजकीय महत्वाकांक्षेसाठी मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा बळी घेतला. असा व्यक्ती कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला होता.
जितेंद्र आव्हाडांना टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी सिनेमाचा डॉयलॉग वापरला होता. ते म्हणाले होते की, "गणेश नाईकांचं नाव घेतलं तर आपलं भाषण ऐकतील असं काहींना वाटतं. ते भाषण ऐकण्यासाठी गणेश नाईकांचं नाव घेत आहेत. मी जो डायलॉग बोललो ती बाब खरी आहे. तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक". तसेच माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची केस दाखल नसून खंडणी मागितली नसल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं होतं.
Jitendra Awhad vs Ganesh Naik | आव्हाडांच्या 'खंडणीखोर' असल्याच्या टीकेला गणेश नाईकांचं उत्तर
गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, जितेंद्र आव्हाडांची टीकाBefore You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ





















