एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमणाचा विळखा! विद्यापीठाची अडीच एक्कर जागा एसआरए प्रकल्पासाठी?

मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमणाचा विळखा बसला असून अतिक्रमण होत असताना विद्यापीठ प्रशासन झोप घेतंय का? असा सवाल सिनेट सदस्यांनी विचारला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कालिना संकुलाला कंपाऊंड वॉल नसल्याने, कोणतीही योजना प्रस्तावित नसलेल्या ओसाड जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न नेहमी ऐरणीवर राहिला आहे. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील अडीच एकर जागेवर ambit रियालटी डेव्हलपर्सने आपला बोर्ड लावला असून एसआरएच्या या प्रकल्पाचे अतिक्रमण या जागेवर झाले आहे. प्रकल्पाची जाहिरात आल्यानंतर विद्यापीठाला या अतिक्रमणासंदर्भात जाग आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून या एसआरए प्रकल्पाला लीगल नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. 

दरम्यान विद्यापीठ प्रशासन या प्रकल्पाला एसआरएची मंजूरी मिळेपर्यंत आणि जाहिरात आल्यानंतर सुद्धा विद्यपीठ प्रशासन झोपले होते का? असा सवाल युवासेना सिनेट सदस्यांनी उपस्थित केला. 

कुलगुरूंच्या बंगल्यामागील आणि विद्यापीठाच्या 300 चौरस मीटर क्षेत्रफळावर काही झोपडपट्ट्या मागील काही वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान जून 2021 मध्ये एसआरए प्राधिकरणाकडे हा पूर्ण परिसर एसआरए प्रकल्प घोषित करण्यासाठी अर्ज करण्यात आला. दरम्यान ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत हरकत घेण्यास मुदत ही जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली होती. त्याच काळात विद्यापीठ प्रशासनाकडून त्यावर हरकत नोंदविली गेली. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे विद्यापीठाकडून सदर प्रकल्पाला लीगल नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली. सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सदर प्रकरण गुरुवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उघडकीस आणले. मुंबई विद्यापीठाच्या जागेचा परिसर अशाप्रकारे अतिक्रमणाच्या विळख्यात येत असताना शासनाकडून होणाऱ्या शासकीय संगीत महाविद्यालयासाठी मात्र मुंबई विद्यापीठाकडे जागा नाही यावर सावंत आणि इतर युवासेना सिनेट सदस्यांनी हरकत घेऊन प्रश्न उपस्थित केला.

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
मुंबई विद्यापीठाने 2021 च्या हिवाळी सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अद्याप कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने या सत्रातील परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असताना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मागील वर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांना सोडवावी लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Embed widget