एक्स्प्लोर

कोरोनामुळे मधुमेही नसलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत धोकादायक वाढ

ज्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही, अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांसाठी हे चिंतेची बाब ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संशोनधानुसार आता कोरोनाव्हायरसही रक्तातील साखरेची पातळी वाढवत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : इंटरनॅशनल डायबेटिज फेडरेशनच्या मते, "मधुमेही रुग्णांच्या संख्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, असामान्य कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड पातळी हे मधुमेहाला आमंत्रित करतात. नुकत्याच झालेल्या संशोनधानुसार आता कोरोनाव्हायरसही रक्तातील साखरेची पातळी वाढवत असल्याचे दिसून आले आहे. ज्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही, अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांसाठी हे चिंतेची बाब ठरत आहे." रुग्णालयात असे सुमारे चार ते पाच रुग्ण आढळत आहेत. "मधुमेहाचे रुग्णही केटोएसीडोसिससारखी समस्या घेऊन रुग्णालयात येत आहेत," अशी प्रतिक्रिया मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे प्रमुख आणि (कोविड-19) टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी व्यक्त केली.

दिवसेंदिवस भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव Sars Cov-2 आहे. शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू चिकटून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो. श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये कोरोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू इतर पेशींवरही हल्ला करतात. कोरोना या विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. सार्स प्रकारातील कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. असे आढळले आहे की कोरोनाग्रस्त बर्‍याच रुग्णांना मधुमेह नसतानाही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीत वाढली असून अशा रुग्णांना धोका असल्याचे दिसून आले. साखरेची उच्च पातळी पातळी आणि केटोआसिडोसिससारख्या समस्या असलेले रुग्ण हे कोविड पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका 41 वर्षीय महिलेला गेल्या पाच दिवसांपासून ताप येणे, घसा खवखवणे आणि अंगदुखी तसेच तीन दिवसांपासून त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्या जाणवत असल्याने रुग्णालयात उपचारांकरता दाखल करण्यात आले होते. सतत तहान लागणे तसेच वारंवार लघवी होणे अशी इतर कोणतीच लक्षणे या महिलेमध्ये दिसून आली नाही. या महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. रुग्णाला आपत्कालीन विभागात प्रवेशासाठी सादर केले. रक्तातील साखर 530 इतकी होती. तिचा सीरम आणि युरिन केटोन्स पॉझिटिव्ह होते. महिलेला मधुमेहाचा पूर्व इतिहास नसल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.

"कोरोनाचा विषाणू माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यास एसीई-2 हे प्रथिन साहाय्यभूत ठरते. हे प्रथिन फुप्फुसच नव्हे तर स्वादुपिंड, लहान आतडे, मूत्रपिंडातही अस्तित्वात असते. पेशींमध्ये कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ग्लुकोजच्या प्रमाणावर त्याचा विपरित परिणाम होतो," अशी माहिती डॉ केदार तोरस्कर यांनी दिली. तसेच कोरोना व्हायरस हिमोग्लोबिनवर हल्ला करत असल्याने ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्ण मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे जातो.

मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्येही मृत्यू ओढावण्याची दाट शक्यता आहे. मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब धोकादायक ठरते आहे. तर, ही एक सामान्य गोष्ट आहे. 60 वर्षावरील व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर जगभरात या वयोगटातील व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. डॉ. तोरस्कर म्हणाले की, "मुंबईतील सद्य परिस्थिती पाहता आयसीयूतील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना घरीच आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यांना त्यानुसार औषधे दिली जात आहेत. गंभीर लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना आधी दाखल करुन घेतले जात असून त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget