एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: राज्यात अतिवृष्टी, सरासरीच्या 102 टक्के अधिक पाऊस, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

Devendra Fadnavis on Wet Drought: आतापर्यंत राज्य सरकारने 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले आहेत. सगळी मदत लवकरच शेतकऱ्यांना मिळेल.

Devendra Fadnavis on Maharashtra Heavy Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. आतापर्यंत 975.5 मिलिमीटर पाऊस (Heavy Rain) पडला आहे. हा सरासरीच्या 102 टक्के अधिक पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीने मदत दिली जाईल. संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही. आतापर्यंत राज्य सरकारने 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले आहेत. यापैकी 1829 कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Wet Drought)

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील पूरपरिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले. पूरपरिस्थितीमुळे काही भागात लोक अडकले आहेत. बीड, धाराशिव या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. धाराशिव आणि बीड परिसरात बचाव मोहीम सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यात 27 जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले आहे. तर 200 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अहिल्यानगर, बीड, परभणी, जळगाव आणि सोलापूर या भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले आहेत. या परिसरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या 17 तुकड्या तैनात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra Rain: सगळे पंचनामे होईपर्यंत वाट बघणार नाही, जसा पंचनामा होईल, तसे शेतकऱ्यांना पैसे मिळणार: देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. सगळे पंचनामे झाल्यावर एकत्रित मदत करण्याऐवजी जसे पंचनामे होतील, तशी तातडीने मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबिले आहे. आम्ही सातात्याने जीआर काढत आहोत, एक सिंगल जीआर नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी 1829 कोटी रुपयांची मदत ग्राऊंडवर पोहोचली आहे. पण यासोबत नवीन ठिकाणी पाऊस सुरु आहे, तेथील पंचनामे करुन मदत करण्याचे काम सुरुच राहील.

सध्या एखाद्या जिल्ह्यात कमी मदत दिसत असेल तर ते प्रमाण नंतर वाढेल. आता एखाद्या तालुक्याचा नुकसानभरपाईचा अहवाल आधी आला तर त्यांना मदत करायची, हे आपले धोरण आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. याशिवाय, पावसामुळे झालेले मृत्यू आणि दुर्दैवी घटनांसाठी मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांन देण्यात आले आहे. मृत जनावरे आणि घरांच्या नुकसान भरपाईची मदत देण्याचे अधिकारही आपण स्थानिक पातळीवर दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांमधील पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढाव घेण्यात आला. उद्या सर्व पालकमंत्री पूरग्रस्त भागांना भेटी देतील. मी स्वत: काही भागांमध्ये जाणार आहे. जिथे मोठ्याप्रमाणात मदतकार्य सुरु आहे, तिकडे अडथळा येऊ नये, अशा पद्धतीने हे दौरे सुरु राहतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Wet Drought: राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार की नाही?

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विरोधक आणि शेतकरी करत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी यावर स्पष्टपणे बोलणे टाळले. त्यांनी म्हटले की, याठिकाणी जे काही नुकसान झालं आहे, जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे, तेवढी आम्ही देऊ. खरडून गेलेल्या जमिनींसाठी जीआर आहे, मदत करता येते, नरेगाच्या माध्यमातून आपण मदत करतो. खरडून गेलेल्या जमिनींसाठी मदत करण्यासाठी जे निकष आहेत, त्यामध्ये बदल करावेत, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. राज्य सरकार त्याविषयी सकारात्मक विचार करत आहे. केंद्र सरकारकडून मदत येण्यासाठी वेळ लागेल. कारण सगळे मूल्यमापन करुन एकच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जातो, नंतर मदत येते. मात्र, केंद्र सरकारने आपल्याला एनडीआरएफतंर्गत अगोदरच पैसे दिलेले असतात. ते पैसे आपण खर्च कररतो. केंद्र सरकार निश्चितच मदत करेल, पण तोपर्यंत राज्य सरकार थांबणार नाही. आम्ही शक्य ती तातडीची मदत शेतकऱ्यांना करुन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

ओला दुष्काळ म्हणजे काय, जाहीर करण्याचे निकष काय, फायदे काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
Mumbai News : मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
Mumbai Crime News : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचाच डल्ला; चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद, आरोपीला बेड्या
मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचाच डल्ला; चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार
Devendra Fadnavis On Ashok Kharat : खरात प्रकरणी विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इटलीच्या पीएम मेलोनींसोबत हसतखेळत सेल्फी काढली अन् डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ' पण मी तुम्हाला कधीच मतदान करणार नाही..' पण मेलोनींच्या शांतीत क्रांतीच्या उत्तरानं सर्वाचं मन जिकलं!
Video: इटलीच्या पीएम मेलोनींसोबत हसतखेळत सेल्फी काढली अन् डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ' पण मी तुम्हाला कधीच मतदान करणार नाही..' पण मेलोनींच्या शांतीत क्रांतीच्या उत्तरानं सर्वाचं मन जिकलं!
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन, खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन, खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक
Ashok Kharat: एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
IPL All-Time Playing XI : रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
Devendra Fadnavis and Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांविरोधात पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
रुपाली चाकणकरांविरोधात पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Embed widget